loader image
[ays_poll id=7]

वारकऱ्यांसाठी शासनाची ” विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र ” योजना

Jun 21, 2023


महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महत्वपूर्ण घोषणा केली आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने वारीच्या ३० दिवसांसाठी विमा संरक्षण मिळणार आहे. राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.

‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजनेत ‘या’ बाबींचा समावेश :

– एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
– दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील.
– अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये देण्यात येतील
– वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळणार.

वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होऊन त्यात वारकरी बांधव जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. या आपत्तीमध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी बांधवांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.


अजून बातम्या वाचा..

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करत मानले आभार

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करत मानले आभार

नांदगाव - सतत वारकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे कुटुंबप्रमुख या नात्याने आज तालुक्यातील...

read more
मनमाड बस डेपोत  इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

मनमाड बस डेपोत इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

मनमाड इंधन बचाव ही काळाची गरज असून पुढच्या पिढीसाठी इंधन साठा राहील, हा विचार करून इंधनाचा...

read more
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

त्रंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरा गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम कार्यक्रम...

read more
तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

न्यायडोंगरी (प्रतिनिधी) न्यायडोंगरीच्या अगदी मध्यभागातून जाणारी मध्य रेल्वेची भुसावळ मुंबई भुसावळ...

read more
.