loader image
[ays_poll id=7]

वारकऱ्यांसाठी शासनाची ” विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र ” योजना

Jun 21, 2023


महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महत्वपूर्ण घोषणा केली आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने वारीच्या ३० दिवसांसाठी विमा संरक्षण मिळणार आहे. राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.

‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजनेत ‘या’ बाबींचा समावेश :

– एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
– दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील.
– अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये देण्यात येतील
– वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळणार.

वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होऊन त्यात वारकरी बांधव जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. या आपत्तीमध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी बांधवांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) वतीने उपोषणाचा इशारा…

नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) वतीने उपोषणाचा इशारा…

आज दि. ०४ नोव्हेंबर २०२३नांदगांव तालुक्यामध्ये या वर्षी सर्वात कमी पर्जन्यमान झालेले आहेत जून...

read more
नाशिक जिल्ह्याचा दुष्काळ ग्रस्त यादीत  समावेश करावा – डॅा. भारती पवार, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची मुंबईत भेट घेवुन केली मागणी

नाशिक जिल्ह्याचा दुष्काळ ग्रस्त यादीत समावेश करावा – डॅा. भारती पवार, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची मुंबईत भेट घेवुन केली मागणी

मुंबई: राज्यात जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाने फिरविलेली पाठ, त्यामुळे भूजलाची कमतरता, पेरणीखालील...

read more
बघा व्हिडिओ – प्रशासनाने नांदगाव तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

बघा व्हिडिओ – प्रशासनाने नांदगाव तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

मनमाड - नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत असून...

read more
नांदगाव येथील रेल्वे अभियंता आणि कर्मचाऱ्याची समय सूचकता – प्रसंगावधान राखत होणारा रेल्वे अपघात,वित्तहानी आणि जीवितहानी पासून रक्षण

नांदगाव येथील रेल्वे अभियंता आणि कर्मचाऱ्याची समय सूचकता – प्रसंगावधान राखत होणारा रेल्वे अपघात,वित्तहानी आणि जीवितहानी पासून रक्षण

मनमाड - नांदगाव डेपो मधील हेल्पर खलाशी या पदावर नियुक्त असलेले कर्मचारी दगडू शेषराव आहेर हे...

read more
नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्याबाबत आमदार सुहास आण्णा कांदे आग्रही : मुख्यमंत्री यांची सकारात्मक भूमिका

नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्याबाबत आमदार सुहास आण्णा कांदे आग्रही : मुख्यमंत्री यांची सकारात्मक भूमिका

मनमाड - आमदार सुहास आण्णा कांदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत नांदगाव...

read more
.