loader image
[ays_poll id=7]

जनजाती कल्याण आश्रम मनमाड शाखेची शबरीमाला वसतीगृहाला भेट

Jun 25, 2023


जनजाती कल्याण आश्रमाच्या मनमाड शाखेच्या कार्यकर्त्यांनी कनाशी येथील शबरीमाता वसतिगृहाला भेट देऊन तेथे आलेल्या नविन मुलींचे स्वागत केले. दरवर्षी प्रमाणे जनजाती कल्याण आश्रमाच्या मनमाड शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कनाशी सहलीचे आता जनतेतून देखील कौतुक केले जात असून या वर्षी देखील मोठ्या संख्येने समाजातील मान्यवर या सहलीत सहभागी झाले होते. दुर्गम भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी जे प्रयत्न जनजाती कल्याण आश्रमाच्या वतीने केले जातात त्यापैकी कनाशी येथे वसतिगृह हा एक प्रकल्प गेली अनेक वर्षे कार्यरत आहे व मनमाडच्या दानशूर मान्यवरांच्या माध्यमातून कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते तेथे सतत आवश्यक वस्तूंची ,निधीची तरतूद करत असतात यातूनच नवनविन कल्पना राबऊन वनवासी समाज बांधवांना आपले पणाने जवळ करण्याचा प्रयत्न केला जातो.अतिशय दुर्गम भागातून आलेल्या या मुलींना सांभाळण्यासाठी व्यवस्थापिका देखील वनवासी समाजातील असल्याने चांगला सुसंवाद साधला जातो आणि मुली अभ्यासात देखील उत्तम प्रगती करतात हा अनुभव आहे,म्हणून दरवर्षी जून महिन्यात आलेल्या सर्व मुलींचे शालेय उपयोगाच्या वस्तू देऊन स्वागत करण्यात येते या निमित्ताने आयोजित सहली मध्ये सहभागी झालेले विविध मान्यवर देखील आपापल्या परीने देणगी देण्याचा प्रयत्न करतात.यंदाच्या या उपक्रमात सहभागी झालेले श्री नितिन देशपांडे,केशव गोडबोले,घोरपडे सर,श्रीमती उफाडे,विक्रम सप्रे ,रमाकांत मंत्री कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते शशिकांत भागवत,प्रकाश कुलकर्णी,प्रकाश गाडगीळ,हेमंत पेंडसे,संदीप सिनकर इत्यादी कार्यकर्त्यांनी मंगेश वाणी,सुभाष माकुणे,अनंता कुलकर्णी,बन्सल परिवार, स्व राम वैशंपायन ,स्वप्नील कुलकर्णी ( उमराणे) गुरुजित सिंह कांत श्रीधर सांगळे व ज्येष्ठ कार्यकर्ते रंगनाथ कीर्तने परिवार यांच्या कडून व यांच्या शिवाय अनेक मान्यवरांनी धान्य,कपडे, तेल डबा, शालोपयोगी साहित्य ,शिलाई मशिन व अन्य उपयोगी वस्तूंची देणगी तेथे सुपूर्द केली आहे या प्रसंगी तेथे उपस्थित असलेले जनजाती कल्याण आश्रमाचे विभाग स्तरावरील कार्यकर्ते नानाजी देवरे यांनी सर्व मनमाड करांचे स्वागत करून वसतीगृहाच्या दैनंदिन कार्याची ,मुलींच्या दैनंदिनीचा व अन्य व्यवस्थांची माहिती देऊन आज ही या सर्व व्यवस्था कशा आवश्यक आहेत हे सांगताना दुर्गम भागातील समाजावर येणारी विविध प्रकारची संकटे प्रामुख्याने गरिबी व त्यामुळे होणारे धर्मांतर यावर प्रकाश टाकला,मनमाड चे तरुण कार्यकर्ते योगेश म्हस्के यांनी मनोगत व्यक्त करतांना आम्ही यापुढे मोठ्या प्रमाणात अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे भावनात्मक आश्वासन दिले, प्रकाश कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात मनमाड हून कार्यकर्ते ज्या पद्धतीने कार्य करीत असतात त्याची माहिती सांगून सतत वाढते संकलन ही समाजाने हे कार्य स्वीकारल्याचे द्योतक असल्याचे नमूद केले आणि त्यांनी वसतिगृहातील दहावी बारावी परीक्षेत यशस्वी झालेल्या मुलींचा कार्यक्रमाचे अध्यक्ष कीर्तने यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व उपयोगी साहित्य देऊन त्यांचा सन्मान करवून घेतला, व्यवस्थापिका गावित ताईंनी आभार मानले निलेश पवार यांनी सूत्र संचालन केले,वसंत महाले यांनी सर्व पाहुण्यांची चोख व्यवस्था ठेवत आश्रम कुठेही कमी पडत नाही असेच जणू दाखवून दिले वसतिगृहातील मुलींनी स्वागत गीत गात सर्व पाहुण्यांचे आदरपूर्वक स्वागत केले, कनाशी कडे जाताना देवघरे परिवार आणि मनमाड कडे येताना दीपक वेढणे परिवार यांनी कळवण येथे देखील सुंदर स्वागत केल्याने ही एक अत्यंत प्रभावी अशी सहल झाली ज्यात श्री व सौ भागवत ,श्री व सौ मंत्री ,कीर्तने यांचा पूर्ण परिवार,अनिल दादा काकडे ,विवेक हातेकर,विनायक गांगुर्डे, सौ देवघरे, श्रीमती गवळी व अन्य मान्यवर सहभागी झाले होते.


अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.