loader image
[ays_poll id=7]

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे – राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाची चौकशीची मागणी

Jun 26, 2023


मनमाड शहरातील नियोजीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ते बंद करण्यात आले आहे.सदर काम मंजूर आराखडा आणि अंदाजपत्रकानुसारच करून बोगस कामाची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी राष्ट्रवादी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव आणि शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख माधव शेलार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व्ही. एन. दराने यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

आमदार सुहास कांदे यांनी विशेष प्रयत्न करत मंजुरी आणून, सदर पुतळ्याला ५० लाख रुपये निधी उपलब्ध करून शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मेघडबरीसह पूर्णाकृती बसवण्याचे काम सुरू आहे. मात्र सदर ठेकेदाराने महाराजांच्या पुतळ्याचे निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याने काम बंद करण्यात आले आहे. राष्ट्रवादी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव आणि शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख माधव शेलार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व्ही. एन. दराने यांना निवेदन देत नाराजी व्यक्त केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, या बांधकामाचे आराखडा आणि अंदाजपत्रकानुसार होत नसल्याने अनेक चुका आढळून आल्या आहेत. ठरलेल्या मानकानुसार काम होत नाही. महाराष्ट्राचे आराध्य देवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे बांधकाम अंत्यात निकृष्ट दर्जाचे होत आहे. या बांधकामासाठी वापरलेले बांधकाम साहित्य, वाळू, सिमेंट, खडी, लोखंडी सळई आणि इतर साहित्य हे हलक्या आणि निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे सदर काम थांबविण्यात आले असून अशीच स्थिती महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबत झाली आहे. त्यामुळे ५० लाख रुपये निधी मंजूर असताना सदर बांधकाम निकृष्ट होत आहे. मंजूर आराखडा आणि अंदाजपत्रकानुसार का केले जात नाही. याकडे पालिकेच्या किंवा संबधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा दर्जा तपासणारे करतात तरी काय असा सवाल आहे. बांधकामात मोठा गैरव्यवहार होत असून त्याची सखोल चौकशी करावी, संबंधीत ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे. सदर पुतळ्याचे बांधकाम हे अनुभवी स्थानीक बांधकाम व्यावसायिकास द्यावे, बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी स्थानिक नागरिकांची समिती स्थापन करावी त्यात वेगवेगळ्या नागरिकांचा समावेश असावा. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छोडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वीच अर्धाकृती पुतळ्यांना ऐतिहासिक महत्व आहे. हे पुतळे म्हणजे शहराचा वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा ठेवा आहे. त्यामुळे सदर पुतळ्यांना कोणत्याही व्यक्ती अथवा संस्था, संघटनांना न देता त्याचे पालिकेच्या वतीने जतन व्हावे, पालिकेच्या नियोजित नवीन इमारतीत दर्शनी भागात त्यांची स्थापना केली जावी. तो पर्यंत सध्याच्या पालिका इमारतीत त्यांची सन्मानपूर्वक स्थापना करावी अशी मागणीही केली आहे.


अजून बातम्या वाचा..

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री...

read more
.