loader image
[ays_poll id=7]

राजसत्तेचा वापर जनतेच्या शिक्षणासाठी करणारे शाहू महाराज खरे राजर्षी – अलका नागरे – साळवे

Jun 29, 2023


मनमाड :- ”आपल्या लेकरांना शिक्षण न देणाऱ्या पालकांना दंड देणारे राजर्षि शाहू महाराज, बहुजन- ओबीसींना शिक्षणाच्या क्षेत्रात आणणारे पहिले छत्रपती नाहीत तर क्रांतीबा महात्मा फुले यांच्या नंतर सर्वात मोठी शैक्षणिक क्रांती करणारेही पहिले छत्रपती आहेत. सामान्य जनतेचा जीवनात शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन राजसत्तेचा वापर प्रथमतः जनतेसाठी करणारे शाहू महाराज हे खरोखर राजर्षि होते,” असे प्रतिपादन सत्यशोधक चळवळीतील तरुण – अभ्यासू कार्यकर्ती अलका नागरे-साळवे यांनी केले.
राजर्षि शाहू महाराज जयंती निमित्ताने मनमाड बचाव समिती, सत्यशोधक मंच, जनहित विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. मनोज गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ओबीसी समाज बांधवांच्या मेळाव्यात ” ओबीसी आरक्षण आणि राजर्षि शाहू महाराज” या विषयावर अलका नागरे बोलत होत्या.
”विधवा पुनर्विवाहाचा कायदा शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात प्रथम पारित केला तर ओबीसी समाजातील गरीब शेतकऱ्यांना बी-बियाणे, बैलजोडी देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतरचे ते दुसरे छत्रपती होते. आज ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गोठविले जात असून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली जात आहे. नवीन शैक्षणिक धोरण लागू करून आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून महागडे शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरु असून आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या ओबीसी बहुजनांना,शेतकऱ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान रचले जात आहे. रोजगाराचा मोठा प्रश्न ओबीसी समाजासमोर असताना धर्म-जात यांच्या झगड्यात ओबीसींना गुंगविले जात आहे. ओबीसींनी हे कारस्थान एकजुटीने हाणून पाडले पाहिजे,” असे आवाहनही नागरे यांनी केले.
प्रारंभी मुस्लिम पखाली(भोई) समाजाच्या वयोवृद्ध कार्यकर्त्या खुर्शीदबी शेख यांच्या हस्ते राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन करण्या आले. मनमाड शहरातील विविध ओबीसी समाजातील ३७ घटक जातींनी मेळाव्यात सहभाग दिला असता घटक समाजाच्या प्रमुखांचा रामदास पगारे, कमल जाधव, सतीश केदारे, अलका नागरे, रश्मी मोरे, मोतीराम भालेराव, मनोज गांगुर्डे, सुनीता महाले व इतर कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सर्वश्री सदाशिव सुतार, नरेंद्र कांबळे, भागीनाथ सोनार, सतीश केदारे आदींनी मनोगतातून ओबीसी एकतेचे आवाहन केले. शाहीर अर्जुन साळवे यांनी ‘ ओबीसी डेटा कुठं हाय वो ‘ हे गीत गाऊन सर्वांची वाहवा मिळवली. सूर्यकांत राजगिरे, अशोक परदेशी, राम महाले आदींनी प्रास्ताविकातून विविध भूमिका मांडल्या. आर.बी. ढेंगळे, चंद्रकांत जाधव, महेश दारुंटे, अमर चव्हाण आदींनी संयोजन केले. रतन निकम यांनी आभार प्रदर्शित केले. सुषमा तिवारी, सुनीता राजगिरे, शांताबाई पटवार, सुरेश वाघ आदींनी सह्योग दिला.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिष्टमंडळाकडून मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन

नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिष्टमंडळाकडून मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन

मनमाड :- नांदगाव मतदारसंघात यंदाच्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने प्रचंड दुष्काळाचे सावट निर्माण झाले...

read more
नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) वतीने उपोषणाचा इशारा…

नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) वतीने उपोषणाचा इशारा…

आज दि. ०४ नोव्हेंबर २०२३नांदगांव तालुक्यामध्ये या वर्षी सर्वात कमी पर्जन्यमान झालेले आहेत जून...

read more
नाशिक जिल्ह्याचा दुष्काळ ग्रस्त यादीत  समावेश करावा – डॅा. भारती पवार, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची मुंबईत भेट घेवुन केली मागणी

नाशिक जिल्ह्याचा दुष्काळ ग्रस्त यादीत समावेश करावा – डॅा. भारती पवार, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची मुंबईत भेट घेवुन केली मागणी

मुंबई: राज्यात जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाने फिरविलेली पाठ, त्यामुळे भूजलाची कमतरता, पेरणीखालील...

read more
.