महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहरात मोठ्या प्रमाणात ‘एक सही संतापाची’ हा उपक्रम मंगळवारी राबविण्यात आला.
महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरू असल्याने जनतेच्या मनातील संताप व्यक्त करण्यासाठी ‘एक
सही संतापाची’ हा उपक्रम राबवण्यात आला. शहरात एकात्मता चौकात मनसेच्या वतीने मोठ्या डिजीडल फलकावर नागरिकांची स्वाक्षरी घेण्यात आली.
प्रदेश सरचिटणीस नाशिकचे माजी महापौर, अशोक मुर्तडक, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, जिल्हाउपाध्यक्ष अनंत नाना सांगळे, महिला प्रदेश
अध्यक्षा सुजाता डेरे, महिला • जिल्हाध्यक्ष वैशाली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सह्या केल्या असे आयोजक व मनसे शहराध्यक्ष सचिन शिरुड यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर सर्व आजी -माजी पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य व नागरीक यांनी यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.













