loader image
[ays_poll id=7]

“हिरवी वनराई – हिरवी बेटे” उपक्रमांतर्गत शंभर वृक्षांचे रोपण – मनमाड बचाव कृती समितीचा पुढाकार

Jul 20, 2023


मनमाड – “हिरवी वनराई- हिरवी बेटे” ही संकल्पना अनोखी असून मनमाड शहराला हरित मनमाड बनविण्याबरोबरच पर्यावरण आणि पर्जन्याबाबतच्या दूरदृष्टीलाही कृतीशील चालना देणारी आहे,”असे प्रतिपादन ख्यातनाम डॉक्टर तथा लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ.अजय भन्साळी यांनी केले. शहरातील मूकबधिर तथा दिव्यांग मुलांसाठीच्या निगराणी प्रशाळेच्या प्रांगणात मनमाड बचाव कृती समिती, सत्यशोधक मंच आणि जनहित विकास संस्थेमार्फत ” हिरवी वनराई- हिरवी बेटे” या उपक्रमांतर्गत शंभर वृक्षांचे रोपण करून दुसऱ्या क्रमांकाचे बेट तयार करण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. याआधी 252 वृक्षांचे संगोपन महात्मा फुले वाचनालय प्रांगणात पहिल्या हिरव्या बेटातून करण्यात आलेले आहे. याप्रसंगी डॉ.अजय भन्साळी बोलत होते. “मूकबधिर तथा दिव्यांग मुलांचे संगोपन आणि शिक्षण देण्याचे महा कठीण कार्य करून ह्या मुलांना समाजात सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अपार कष्ट निगराणी प्रशाळेच्या सौ.सुनीता महाले घेत आहेत, ही गौरवाची बाब आहे,” असा सन्मान डॉ.भन्साळी यांनी करताच सभागृहात जोरदार टाळ्यांचा गजर दूमदूमला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यशोधक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक परदेशी यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की ,”आम्ही बचाव समितीच्या माध्यमातून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून न्यायालयामार्फत करंजवण जल योजना प्रस्तावित केलेली आहे. आज “हिरवी बेटे” या उपक्रमातून यंदा दहा ठिकाणी “हिरवी वनराई- हिरवी बेटे” उभारण्याचा संकल्प करून मनमाडला ‘हरित मनमाड’ बनविण्यासाठी निर्धार करीत आहोत. नागरिकांनी यात सहभाग द्यावा,” असे आवाहनही त्यांनी केले. श्री. पोपटशेठ बेदमुथा व माजी नगरसेवक महेंद्र शिरसाठ यांनीही आपापले मनोगत मांडले.
यावेळी मंचावर माजी नगरसेवक दिलीप तेजवानी, इंजि.अमर चव्हाण, सुषमा तिवारी, रश्मी मोरे,बबीता चिंडालिया, रमेश खरे, सूर्यकांत राजगिरे,सुशांत केदारे, मनोज गांगुर्डे, रवी इप्पर, महेश दारुंटे, आर.बी. ढेंगळे,बी.टी.पद्मने, सौ. चव्हाण, मधुकर मोरे,श्याम महाले तसेच विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. राम महाले आणि जनार्दन देवरे यांनी सूत्रसंचालन केले.प्रास्ताविक सौ.सुनीता महाले यांनी तर निगराणीच्या शिक्षक वृंदाने आयोजन केले.


अजून बातम्या वाचा..

ऐन दुष्काळात 50 वर्षात पहिल्यांदा पाटाला आले पाणी, आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले जलपूजन, शेतकऱ्यांनी केला आमदार सुहास आण्णा कांदे यांचा नागरी सत्कार

ऐन दुष्काळात 50 वर्षात पहिल्यांदा पाटाला आले पाणी, आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले जलपूजन, शेतकऱ्यांनी केला आमदार सुहास आण्णा कांदे यांचा नागरी सत्कार

नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित...

read more
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र आयोजित नमो चषक 2024 राज्यस्तरीय भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत नांदगाव तालुकास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा.

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र आयोजित नमो चषक 2024 राज्यस्तरीय भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत नांदगाव तालुकास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा.

  मनमाड:- भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक आयोजित नमो चषक 2024 टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे भव्य...

read more
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा: डॉ भारती पवार

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा: डॉ भारती पवार

  विकसित भारत संकल्प यात्रा जनजागृती कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि...

read more
भाजपा मनमाड मंडल तर्फे भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची 99 जयंती सुशासन दिन म्हणून साजरी

भाजपा मनमाड मंडल तर्फे भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची 99 जयंती सुशासन दिन म्हणून साजरी

मनमाड - भाजपा मनमाड मंडल तर्फे भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्ते चे प्रमुख प्रेरणा स्थान माजी...

read more
चौथ्या महिला धोरणास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील? – वडिलांच्या आधी लावावे लागणार आई चे नाव

चौथ्या महिला धोरणास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील? – वडिलांच्या आधी लावावे लागणार आई चे नाव

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या बारातमती दौऱ्यावर असून तेथे त्यांनी शासकीय धोरणांवरही...

read more
.