loader image
[ays_poll id=7]

“हिरवी वनराई – हिरवी बेटे” उपक्रमांतर्गत शंभर वृक्षांचे रोपण – मनमाड बचाव कृती समितीचा पुढाकार

Jul 20, 2023


मनमाड – “हिरवी वनराई- हिरवी बेटे” ही संकल्पना अनोखी असून मनमाड शहराला हरित मनमाड बनविण्याबरोबरच पर्यावरण आणि पर्जन्याबाबतच्या दूरदृष्टीलाही कृतीशील चालना देणारी आहे,”असे प्रतिपादन ख्यातनाम डॉक्टर तथा लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ.अजय भन्साळी यांनी केले. शहरातील मूकबधिर तथा दिव्यांग मुलांसाठीच्या निगराणी प्रशाळेच्या प्रांगणात मनमाड बचाव कृती समिती, सत्यशोधक मंच आणि जनहित विकास संस्थेमार्फत ” हिरवी वनराई- हिरवी बेटे” या उपक्रमांतर्गत शंभर वृक्षांचे रोपण करून दुसऱ्या क्रमांकाचे बेट तयार करण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. याआधी 252 वृक्षांचे संगोपन महात्मा फुले वाचनालय प्रांगणात पहिल्या हिरव्या बेटातून करण्यात आलेले आहे. याप्रसंगी डॉ.अजय भन्साळी बोलत होते. “मूकबधिर तथा दिव्यांग मुलांचे संगोपन आणि शिक्षण देण्याचे महा कठीण कार्य करून ह्या मुलांना समाजात सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अपार कष्ट निगराणी प्रशाळेच्या सौ.सुनीता महाले घेत आहेत, ही गौरवाची बाब आहे,” असा सन्मान डॉ.भन्साळी यांनी करताच सभागृहात जोरदार टाळ्यांचा गजर दूमदूमला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यशोधक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक परदेशी यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की ,”आम्ही बचाव समितीच्या माध्यमातून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून न्यायालयामार्फत करंजवण जल योजना प्रस्तावित केलेली आहे. आज “हिरवी बेटे” या उपक्रमातून यंदा दहा ठिकाणी “हिरवी वनराई- हिरवी बेटे” उभारण्याचा संकल्प करून मनमाडला ‘हरित मनमाड’ बनविण्यासाठी निर्धार करीत आहोत. नागरिकांनी यात सहभाग द्यावा,” असे आवाहनही त्यांनी केले. श्री. पोपटशेठ बेदमुथा व माजी नगरसेवक महेंद्र शिरसाठ यांनीही आपापले मनोगत मांडले.
यावेळी मंचावर माजी नगरसेवक दिलीप तेजवानी, इंजि.अमर चव्हाण, सुषमा तिवारी, रश्मी मोरे,बबीता चिंडालिया, रमेश खरे, सूर्यकांत राजगिरे,सुशांत केदारे, मनोज गांगुर्डे, रवी इप्पर, महेश दारुंटे, आर.बी. ढेंगळे,बी.टी.पद्मने, सौ. चव्हाण, मधुकर मोरे,श्याम महाले तसेच विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. राम महाले आणि जनार्दन देवरे यांनी सूत्रसंचालन केले.प्रास्ताविक सौ.सुनीता महाले यांनी तर निगराणीच्या शिक्षक वृंदाने आयोजन केले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.