loader image
[ays_poll id=7]

मनमाड वासीयांना सुखद बातमी : शहरात उभारले जाणार तीन जलकुंभ तर करंजवण येथील जॅकवेल चे १५ मीटर काम पूर्णत्वाकडे

Jul 25, 2023


मनमाड शहरासाठी जीवनदायी ठरणारी करंजवण योजनेचे काम प्रगतीपथावर असून करंजवण धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणात उभारल्या जाणाऱ्या जॅकवेलचे काम अर्ध्यावरच थांबवावे लागले असले तरी योजने अंतर्गत शहरात उभारल्या जाणाऱ्या ३ नव्या जलकुंभाचे काम पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. करंजवण धरणावर उभारण्यात येणाऱ्या जलकुंभाच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे.

मनमाड शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदार सुहास कांदे विशेष प्रयत्न करत आहे. करंजवण धरणात २७ मीटर उंच व ८ मीटर रुंदीची जॅकवेल (विहीर) उभारण्याचे काम सुरु झालेले असून पैकी १५ मीटर उंचीचे काम झालेले आहे. उरलेल्या १२ मीटरचे कामास अर्धवट सोडावे लागले आहे. करंजवण धरणात पावसाचे पाण्याचा साठा वाढल्याने झालेल्या १५ मीटरच्या कामापर्यंत पाणी पोहचले आहे. त्यामुळे हे काम थांबवावे लागले आहे. या योजनेअंतर्गत मनमाड शहरातील माऊली नगर, मुरलीधर नगर आणि जयजवान ढाब्यालगतच्या वसाहतीत प्रत्येकी एक जलकुंभ उभारण्याचा कामाला ठेकेदार कंपनीकडून सुरुवात करण्यात येणार असून येत्या ५-६ दिवसात पहाणी व प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.

करंजवण धरणावर उभारण्यात येणाऱ्या जलकुंभाच्या जागेबाबतचे प्रस्ताव पाटबंधारे व त्याच्याशी संबंधित विभागाकडे मंजूरीसाठी पाठविलेले असून येत्या १५-२० दिवसात त्यास मंजूरी मिळून करारनामा करण्यासाठी हालचाली सुरु झालेल्या आहेत. लवकरच हा करार होत असून करंजवण योजनेतील महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. आत्तापर्यंतच्या सर्व घडामोडी ह्या ठरल्याप्रमाणेच होत असून योजनाही ठरलेल्या मुदतीत कार्यान्वयीत होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नामुळे शहराला जीवनदायी ठरणारी ३१२ कोटी रुपयांच्या करंजवण योजनेचे भूमिपूजन झाल्यानंतर तत्काळ जलद गतीने कामकाज सुरू असून लवकरात लवकर योजना पूर्ण करण्यासाठी आमदार सुहास कांदे प्रयत्नशील आहे.

जलवाहिनी टाकण्यासाठी २० स्पॉटपैकी १२ ते १५ ठिकाणी गॅप भरुन पुर्ण करण्याचे काम वेगाने होत आहे. मानसी रोज १३५ लिटर पाणी मिळण्यासाठी एकूण १५ लहान-मोठ्या टाक्या बनविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जलवाहिनी योजना ही ऑईल कंपन्यांप्रमाणे – कंप्युटरराईज फायबर ऑप्टिकलने नियंत्रित राहणार आहे. त्यामुळे कुठेही एक थेंब पाण्याची गळती झाल्यास लगेच माहिती मिळणार आहे. त्यामुळे जलवाहिनीतून पाणी चोरणे अशक्य होणार आहे..


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – प्रशासनाने नांदगाव तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

बघा व्हिडिओ – प्रशासनाने नांदगाव तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

मनमाड - नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत असून...

read more
नांदगाव येथील रेल्वे अभियंता आणि कर्मचाऱ्याची समय सूचकता – प्रसंगावधान राखत होणारा रेल्वे अपघात,वित्तहानी आणि जीवितहानी पासून रक्षण

नांदगाव येथील रेल्वे अभियंता आणि कर्मचाऱ्याची समय सूचकता – प्रसंगावधान राखत होणारा रेल्वे अपघात,वित्तहानी आणि जीवितहानी पासून रक्षण

मनमाड - नांदगाव डेपो मधील हेल्पर खलाशी या पदावर नियुक्त असलेले कर्मचारी दगडू शेषराव आहेर हे...

read more
नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्याबाबत आमदार सुहास आण्णा कांदे आग्रही : मुख्यमंत्री यांची सकारात्मक भूमिका

नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्याबाबत आमदार सुहास आण्णा कांदे आग्रही : मुख्यमंत्री यांची सकारात्मक भूमिका

मनमाड - आमदार सुहास आण्णा कांदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत नांदगाव...

read more
दिवाळी आनंदाची – राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप

दिवाळी आनंदाची – राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप

आपण समाजाचे काहीतरी देण लागतो, या उक्ती प्रमाणे दरवर्षी मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.