नांदगाव सोमनाथ घोगांणे
‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वनचरे! पक्षी ही सुस्वरे, आळविती!’ असे संत तुकाराम महाराजांनी मानवाच्या जीवनामध्ये वृक्ष किती महत्त्वाचा आहे हे अभंगातून सांगितले आहे. ‘झाडे तो लेकुरें आपुली! लेकरासारखी जपावी!’ असं छत्रपती शिवाजी महराज यांना वाटत होते.आणि म्हणूनच नांदगाव येथील सौ.क.मा.कासलीवाल माध्य.विद्यालयात पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून
अजितजी बेदमुथा उपस्थित होते. तसेच विनोदजी लोढा ,संस्थेचे चेअरमन माननीय, श्री. सुनीलकुमार कासलीवाल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन माननीय, श्री. सुनीलकुमार कासलीवाल सेक्रेटरी, श्री. विजय चोपडा,जुगलकिशोर अग्रवाल ,रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल,सुशील कासलीवाल, प्रशासन अधिकारी प्रकाश गुप्ता विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्वश्री शरद पवार,विशाल सावंत, प्राचार्य मणी चावला, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता गायकवाड यांनी तर संदीप आहेर यांनी आभार व्यक्त केले.









