loader image
[ays_poll id=7]

नांदगाव  येथील हुतात्मा स्मारकावर कारगिल विजयी दिनानिमित्त अभिवादन

Jul 26, 2023


 

नांदगाव ( प्रतिनिधी) येथील हुतात्मा स्मारकावर कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना विनम्र अभिवादन करण्यात आले. भारत-पाकिस्तान यांच्यात १९९९मध्ये झालेल्या युध्दाचा शेवट २६ जुलै १९९९ ला भारताच्या जवानांनी प्राणांची बाजी लावुन भारताला विजय मिळवून दिला व आपल्या देशाचे संरक्षण केले. या युध्दात शहीद झालेल्या जवानांचे स्मरण करण्यासाठी हुतात्मा चौकात तहसीलदार डॉ.सिध्दार्थ मोरे, नांदगावचे पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी व सेवानिवृत्त ,मेजर, व सैनिक यांनी सर्व प्रथम संविधान प्रतिकृतीला पुष्पहार घालून वंदन केले. व त्यानंतर हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी मेजर नानासाहेब काकळीज यांनी कारगिल युध्दाच्या आठवणी जागवल्या व युध्दप्रसंगातील अनुभव कथन केले. तसेच यावेळी मेजर जगन्नाथ साळुंखे यांनी देखील कारगिल युध्दाची माहिती देऊन येथील हुतात्मा स्मारक निर्मिती कशी झाली याबाबत माहिती सांगितली व शहीद जवानांना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे संयोजन शिवसंस्कार संस्था,व माजी सैनिक कल्याण सेवाभावी संस्थेने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसंस्कार संस्थेचे अध्यक्ष सुमित गुप्ता यांनी केले. याप्रसंगी सुभेदार बाजीराव मोहिते, हवालदार शंकर थेटे, सैनिक कल्याण सेवाभावी संस्थेचे कार्याध्यक्ष नानासाहेब काकळीज, संजय खैरनार,दै.आवाजचे संपादक भगवान सोनवणे,बापू जाधव, मुस्ताक शेख, भावराव जाधव, मधुकर पवार, प्रभाकर पगारे, योगेश जाधव, संदिप बोरसे, श्रावण आढाव, अनंत शेवरे,शामभाऊ पारख, मनोज शर्मा, शिवाजी निकम, शिवाजी गरुड, प्रा. सुरेश नारायणे, गंगाधर औंशिकर,विजय बोरसे, किसन जगधने, वामन पोतदार, सुमित गुप्ता, अकाश पानकर, जेष्ठ नागरिक, व्यापारी, शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित माजी सैनिक व जेष्ठ नागरिक यांचा सत्कार नांदगावचे पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी केला.व शहरातील सामाजिक स्वास्थ टिकविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.