मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षपदी आम्रपाली निलेश वाघ तर सचिवपदी चंद्रकला दिवाकर एळींजे यांची एकमताने निवड करण्यात आले.
कपिल वस्तू बुद्ध विहारात संपन्न झालेल्या बैठकीत यंदा वर्षावासासाठी कार्यकारणी निवडण्यात आली. कार्यकारणीत उपाध्यक्ष -अलकाबाई केदारे, चित्राबाई अंकुश, चंद्रकला प्रकाश एळींजे, लताबाई हिरे,खजिनदार – सुमनबाई गरुड, ऑडीटर-वंदनाबाई अकुंश, संगिता जाधव, मंदाबाई जाधव, अनिता केदारे, भारती केदारे,कार्याध्यक्ष – कमळाबाई एळींजे,निर्मलाबाई अंकुश, कमळाबाई हिरे, शालूबाई आहिरे, इंदुबाई एळींजे, संजिवनी गरुड, शालुबाई भोसले, सभासद -सुमनबाई एळींजे, अंजनाबाई वाघ, मिनाबाई वाघ, लक्ष्मीबाई वाघ, चित्रा डांगळे, ताईबाई केदारे, उषाबाई केदारे सुगंधाबाई निळे, भागुबाई जगताप, अंजनाबाई अंकुश ,निता एळींजे, पायल केदारे यांची निवड करण्यात आली. कपिलवस्तू बुद्ध विहारात आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा असे तीन महिने वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या काळात ” बुद्ध आणि त्यांच्या धम्म” या पवित्र ग्रंथाचे अखंड वाचन करण्यात येणार असून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार नूतन कार्यकारणीने केला आहे.
याप्रसंगी कपिल वस्तू बुद्ध विहार विकास समितीचे अध्यक्ष – अरुण अंकुश, सचिव प्रकाश एळींजे,ऑडिटर – गणेश केदारे, केंद्रीय शिक्षक भागवतराव गांगुर्डे , बौद्धाचार्य मच्छिद्र भोसले आदी उपस्थित होते.

नांदगांव येथे मराठा आरक्षणासाठी उपोषन सुरूच
नांदगांव : मारुती जगधने मनोज जरांगे पाटील यांना उपोषनाची साथ देत नांदगांव येथे साकळी उपोषन सुरु...