loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करा या मागणीसाठी उद्वव बाळासाहेब ठाकरे सेनेचा नांदगाव तहसिलदार यांना निवेदन

Aug 14, 2023


नांदगांव सोमनाथ घोगांणे

नांदगाव तालुक्यात पाऊस नसल्याने तालुक्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.तालुक्यातील शेतकरी,नागरिक,कामगार इतर घटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने नांदगाव तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात यासह विविध मागणीचे निवेदन उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने प्रशासन नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांना देण्यात आले.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
सध्या नांदगाव तालुक्यात पाऊस नसल्याने तालुक्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पेरणी केलेले पिके येऊ शकले नाही. सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी,
तालुक्यातील त्या गावांमध्ये तात्काळ पाणी पुरवठा करावा,
शेतकऱ्यांचे वीज पंपाचे वीजबिल माफ करावे, तालुक्यातील
शेतकऱ्यांचे कांद्याचे अनुदान सरसकट खात्यात जमा करावे,
शेतकऱ्यांचे पिक विमाची रक्कम तात्काळ मिळावी ,तालुक्यातील २००
शिक्षकांचे तात्काळ  रिक्तपदे  भरण्यात यावे,तालुका कृषी
कार्यालयातील 20अधिकारी/कर्मचारी पदे तात्काळ भरण्यात
यावे, तहसील कार्यालयातील रिक्तपदे तात्काळ भरण्यात यावे,
तसेच नांदगाव तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात यावा
अशी मागणी निवेदनात केली आहे..
यावेळी ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक,संतोष बळींद,
तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता,संतोष जगताप,शशिकांत मोरे, सुनील पाटील,संजय कटारिया, सनी फसाटे श्रावण आढाव,दिलीप नंद ,श्रावण चोळके, अँड.सुधाकर मोरे,अशीष घुगे, उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
.