जिल्ह्यातील मराठा समाजाचे जेष्ठ नेते साहेबराव (अण्णा) आनंदा पाटील ( भालूरकर) यांचे सकाळी ५.३३ वाजता मविप्र रुग्णालयात निधन झाले. आज मविप्रचा समाजदिन आणि याच दिवशी मविप्रच्या माजी संचालक असलेल्या अण्णांचे निधन झाले.मविप्र संस्थेच्या जडणघडणीत त्यांचे विशेष योगदान राहिले आहे.जेष्ठ नेते शरद पवार यांचे ते जूने निष्ठावान सहकारी म्हणूनही त्यांची वेगळी ओळख होती. त्यानंनांदगाव तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील दिर्घकाळ नेतृत्व असलेल्या साहेबराव पाटीलांच्या निधनामुळे तालुक्याची मोठी हानी झाली असून राजकीय पटलावर भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा अंत्यविधी दुपारी तीन वाजता भालुर येथे होणार आहे.
“सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प” ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन
शेतीसाठी वाढता खर्च उत्पन्नाची शाश्वती नसणे बाजारभावाची हमी नसणे गारपीट यासारख्या अनेक प्रकारच्या...











