loader image
[ays_poll id=7]

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन आढावा बैठक संपन्न झाली.

Aug 22, 2023


 

नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव विधानसभा मतदारसंघात जलजीवन मिशन अंतर्गत २७ गावांमध्ये विविध कामे सुरू असून या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती, या वेळी बिडीओ श्री गणेश चौधरी संबंधित अधिकारी, सर्व गावांचे ग्रामसेवक तसेच ठेकेदार उपस्थित होते. काम कुठपर्यंत आले, स्थानिक समस्या, इतर अडचणी व कामाचा वेग यावर चर्चा झाली.
आ. सुहास कांदे यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करावे येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील, ग्रामीण भागातील जनतेस तात्काळ पाणी उपलब्ध व्हावे म्हणून कोणतीही काटकसर न करता काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या.

वसंतनगर, चंदनपुरी, कसाबखेडा, चिंचविहिर, रोहिले बु, साकोरा, तळवाडे, न्यायडोंगरी, अनकवाडे रामनगर तांडा, रागुविर तांडा, कासारी इंदिरानगर, पानेवाडी, बेजगाव, वंजारवाडी, कुसुमतेल, माळेगाव कऱ्ह्यात, भार्डी, सावरगाव, कोंढार, नागापुर, जातेगाव, मोहेगाव, ढेकू, बोलठाण, मळगाव या गावात काम सुरू आहे. यामध्ये गावात विहिर, गाव अंतर्गत पाणी वितरण व्यवस्था, पंपगृह, पंपिंग मशिनरी, टाकी आदींचा समावेश असणार आहे.
गुरुवार पासून या सर्व गावात भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी करणार असल्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सांगितले या वेळी संबंधित अधिकारी, ठेकेदार यांनी उपस्थित राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ,उमराणे संचलित,मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,...

read more
महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेल्या संचलनात महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या एनसीसी विद्यार्थ्यांनी...

read more
नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा  पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहराचा पाणी प्रश्न जटील बनत चालला असून एकाच ठिकाणी त्याच मार्गावर...

read more
.