loader image

मनमाड नगरपालिका प्रशासनाचे शहरातील प्रश्नांकडे दुर्लक्ष ; नागरिकांचे हाल – शिवसेना (ऊबाठा) गटाचे धरणे आंदोलन

Aug 28, 2023


मनमाड शहर हे नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर असूनही नगरपालिका प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे व दुर्लक्षामुळे शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मनमाड नगरपालिकेचे प्रशासक चौधरी यांना विविध समस्या आणि मागण्यांचे निवेदन देऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.मनमाड नगरपरिषद सामान्य मनमाडकरांना मुलभूत सुविधा देण्यास कमी पडत असल्याने निष्क्रीय प्रशासनाविरोधात सामान्य जनतेमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पावसाळा असून देखील शहराला मिळणाऱ्या पाण्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मनमाडकरांना सुमारे २२ दिवसानंतर होणारा पाणीपुरवठा योग्य फिल्टरेशन होत नसल्याने अत्यंत दुषीत व निष्कृष्ट दर्जाचे असल्याने संपूर्ण शहरामध्ये पिण्याच्या पाण्यामुळे होणाऱ्या साथीच्या रोगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून उलट्या, जुलाब आदी आजारांमुळे नागरिक बेजार झाले आहे यामध्ये लहान मुले व वृध्दांची संख्या लक्षणीय आहे या सर्व भयानक परिस्थितीस सर्वस्वी नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. नियमितपणे पाणीपट्टी भरून देखील मनमाड नगरपालिका स्वच्छ पाणीपुरवठा करण्यास सक्षम नसल्याने स्थानिक नागरिक अत्यंत संतापलेले आहेत.
मनमाड शहरात विविध भागांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे, अनेक स्ट्रीट लाईट बंद स्वरूपात आहेत तसेच चंद्रभागा लॉन्स ते भगवान बाल्मिकी स्टेडियम पर्यंत फक्त दाखवण्यापुरते वीजेचे खांब उभारण्यात आले आहे मात्र त्या खांबावर आजपर्यंत स्ट्रीटलाईट लावण्यात आलेले नाही त्यामुळे सदर परिसरात मोठ्या प्रमाणावर अंधार पसरला आहे.
त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे बेरोजगारी वाढल्याने मनमाड शहरामध्ये चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे सदर परिसरात अंधाराचा गैरफायदा घेवून कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा किंवा काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी मनमाड नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील.
मनमाड शहरातील सर्व गटारांची वेळच्या वेळी साफसफाई केली जात नसल्याने तसेच प्रत्येक वॉर्डमध्ये कचरा नेणारी गाडी नियमितपणे येत नसल्याने सर्वत्र पाणीचे व कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे दुर्गंधी व डासांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मनमाड नगरपरिषदेतील आरोग्य विभाग व मलेरिया विभागाच्या दुर्लक्षामुळे तसेच नियमितपणे औषध फवारणी होत नसल्याने शहरातील सामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.याप्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक, जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, उप जिल्हा प्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख माधव शेलार, भाऊ पाटील,दिनेश केकाण, कैलास भाबड,अनिल दराडे, विनय आहेर, लियाकत शेख,संजय कटारिया, सनी फसाटे, इरफान शेख, भैया घुगे आदींसह शिवसेना पदाधिकारी,मनमाडकर नागरिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.