नांदगाव तालुक्यातील कासारी व बोलठाण घाटमाथा परिसरात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा पाहणी दौरा आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केला.
कासारी येथील इंदिरानगर, जातेगाव येथील वसंतनगर व चंदनपुरी तांडा येथील कामांचे लोकार्पण या वेळी करण्यात आले. या योजने अंतर्गत नागरिकांना 24 तास शुद्ध पाणी मिळणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याचा स्त्रोत म्हणून विहीर, पाण्याची टाकी, पाईप लाईन व गावं अंतर्गत वितरण व्यवस्था या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी यावेळी उपस्थित महिलांचे अभिनंदन केले, ग्रामीण भागात असलेली वन वन पाहता आता जलजीवन मिशन अंतर्गत 24 तास पाणी उपलब्ध झाले असून माझ्या माता माय माऊलींचे पाण्याची आज पासून थांबलेली आहे असे त्यांनी सांगितले.
मतदार संघातील प्रत्येक घराघरात पाणी पोहोचवण्याचे माझे स्वप्न असून या मार्गाने मी प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याची आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मनोगतात सांगितले.
या वेळी घाटमाथ्यावरील ढेकू,जातेगाव,बोलठाण, रोहिला,येथे सुरू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत कामांची पाहणी करून काम चांगल्या प्रतीचे व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कामाबाबत असलेल्या अडचणी समजून घेत त्याही तात्काळ सोडवण्याचे आश्वासन आमदार सुहास कांदे यांनी दिले.
यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अर्जुन पाटील, नागापूर सरपंच राजेंद्र पवार, जिल्हाप्रमुख किरण देवरे, प्रमोद भाबड, बोलठाण सरपंच वाल्मिक गायकवाड, अनिल रिंढे, रफिक पठाण, दत्तात्रय निकम ,गुलाब चव्हाण, संजय बोरसे, संजय पवार, मनोज रिंढे, गोकुळ कोठारी, बापूसाहेब जाधव, शुभम आव्हाड, आण्णा मुंढे, सौ.अनिता संतोष सरपंच कासारी इप्पर, काशिनाथ काळे, सोनाली राठोड, नितीन शेरेकर, अंबादास पवार, तुळशीराम शिंगाडे, नाना राठोड, प्रकाश चव्हाण, ईश्वर राठोड, भाऊसाहेब चव्हाण,अनिल अरबुज, सरपंच ठकुबाई पवार, अवधूत गायकवाड, सचिन गायखे, भगवान गायखे गटविकास अधिकारी गणेश चौधरी, अशोक बिन्नर उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग नांदगांव यांच्या सह नागरिक उपस्थित होते.
















