जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवाली या गावात सुरू असलेल्या मराठा आंदोलनातील आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून येथे आंदोलन सुरू आहे. पोलीसांनी उचललेले हे पाऊल म्हणजे शांत मराठ्यांना डिवचवण्याचा प्रयत्न असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. जिल्ह्यासह राज्यभरात या घटनेचा निषध व्यक्त करण्यात येत आहे.
मनमाड शहरातही मराठा आरक्षण मागणी करिता जालना येथे आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज निषेधार्थ मनमाड शहरात, रस्तारोको आंदोलन करण्यात आले तसेच निवेदन देऊन जालना एस पी ना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.रस्तारोको आंदोलनामुळे थांबलेल्या वाहणामध्ये रुग्णवाहीका अडकलेली होती,परंतु मनमाड शहर पोलीस प्रशासन व मराठा समाज आंदोलन करते तर्फे सहकार्य करत तात्काळ रुग्णवाहिकेस वाट मोकळी करून देण्यात आली, या वेळी नांदगाव तहसीलदार यांना निवेदन देऊन विविध मागण्या करण्यात आले, रास्तारोको आंदोलनात हजारोच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.














