loader image
[ays_poll id=7]

मुस्लीम समाजाचा चांगला निर्णय

Sep 6, 2023


गणेश विर्सजन व महमंद पैगंबर जंयती एकाच दिवशी असल्याने
महमंद पैगंबर जंयती दुसऱ्या दिवशी २९ ला साजरी होणार

नांदगाव सोमनाथ घोगांणे

गणेश विसर्जन व महंमद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलादुन्नबी एकाच दिवशी आल्याने दोन्ही मिरवणुका एकाच दिवशी निघाल्या तर प्रशासन व पोलीस यंत्रणेवर तणाव वाढू शकतो याची दखल घेऊन मुस्लीम बांधवांचे प्रमुख कार्यकर्ते यांनी नांदगाव पोलीस स्टेशनला अर्ज देऊन गणेश विसर्जनाच्या पुढच्या दिवशी २९ सप्टेंबर रोजी आपला सण साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे शहरात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक प्रीतमकुमार चौधरी यांनी याकामी पुढाकार घेतला होता.

देशात इतरत्र झालेल्या घटनांचे पडसाद नांदगाव शहरात यापूर्वी हिंदू मुस्लीम यांनी एकत्र येत उमटू दिलेले नाहीत असा इतिहास आहे. पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या बैठकीत ‘प्रेमाने एकोपा रहावा’ यासाठी समाजाने पहिले पाउल उचलले आहे असे मत मुस्लीम समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींनी व्यक्त केले. गणेशोत्सव व ईद ए मिलादुन्नबी या सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक आज बुधवार (दि. ०६ सप्टेंबर ) रोजी होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी हा निर्णय जाहीर करण्यात आला. नांदगाव शहरात हिंदू मुस्लीम एकमेकांच्या चालीरीतीना सहकार्य करतात याची उदाहरणे बैठकीत नमूद करण्यात आली.
मुस्लीम चांद्र कॅलेंडरच्या १२ तारखेला म्हणजे २८ सप्टेंबर रोजी ईद ए मिलादुन्नबी आहे. परंतु त्यादिवशी गणेश विसर्जन आहे. यानिमिताने रस्त्यावर होणारी गर्दी लक्षात घेऊन मुस्लीम समाजाने आपला सण २९ सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला त्याला सर्व धर्मियांनी पाठिंबा दिला आहे. पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या बैठकीत अध्यक्ष नासीर पठान, याकुब शेख, बबलू सैय्यद, अकील्भाई मास्तर, अय्याज शेख, कलीम शेख, सिद भाई, मुश्ताक भंगारवाले, इम्रानभाई आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.