loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरात २० तासाहुन अधिक काळ बत्ती गुल

Nov 27, 2023


 

नांदगाव – मारुती जगधने दिनांक २६ रोजी सायंकाळी ५ वा गेलेला वीज पुरवठा तब्बल वीस तासांनी सुरळीत झाला. संपुर्ण रात्र बत्ती गुल झाली होती. नांदगाव ते मनमाड दरम्यान वादळ वार्यात विजेच्या तारा तुटून विजपुरवठा बंद झाला होता.
मागील एका वर्षात प्रथमच २० तास बत्ती गुल झाल्याची घटना घडली मागील काळात नियमित वीज सुरळीत असायचा पण झालेल्या वादळवारा आणी गारपिटीचा फटका महावितरणला बसला वीज खंडित असल्याने नांदगाव कराना रात्र जागून काढावी लागली दरम्यान च्या काळात वीज बंद असल्याने भ्रमणध्वनी ,पिठाच्या गिरण्या,आँनलाईन सेवा, पाणीपुरवठा आदी बंद होते. दि २७ रोजी दुपारी १ वा विजपुरवठा सुरु झाला त्या नंतर ही विजेचे लपंडाव सुरूच होते दुपारचे ४ वाजेले तरी वीज विस्कळित होती.
विजसुरळीत करणे कामी वीज यंञना कामाला लागली असून विजपुरवठा सुरळीत करणे कामी युद्धपातळीवर काम चालू असल्याचे विश्वसनीय सुञांनी सांगीतले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न.    – सेंट झेवियर्स हायस्कूलच्या कु. श्रद्धा शिंदे हिस प्रथम पुरस्कार.

मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न. – सेंट झेवियर्स हायस्कूलच्या कु. श्रद्धा शिंदे हिस प्रथम पुरस्कार.

मनमाड (प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा...

read more
.