loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरात २० तासाहुन अधिक काळ बत्ती गुल

Nov 27, 2023


 

नांदगाव – मारुती जगधने दिनांक २६ रोजी सायंकाळी ५ वा गेलेला वीज पुरवठा तब्बल वीस तासांनी सुरळीत झाला. संपुर्ण रात्र बत्ती गुल झाली होती. नांदगाव ते मनमाड दरम्यान वादळ वार्यात विजेच्या तारा तुटून विजपुरवठा बंद झाला होता.
मागील एका वर्षात प्रथमच २० तास बत्ती गुल झाल्याची घटना घडली मागील काळात नियमित वीज सुरळीत असायचा पण झालेल्या वादळवारा आणी गारपिटीचा फटका महावितरणला बसला वीज खंडित असल्याने नांदगाव कराना रात्र जागून काढावी लागली दरम्यान च्या काळात वीज बंद असल्याने भ्रमणध्वनी ,पिठाच्या गिरण्या,आँनलाईन सेवा, पाणीपुरवठा आदी बंद होते. दि २७ रोजी दुपारी १ वा विजपुरवठा सुरु झाला त्या नंतर ही विजेचे लपंडाव सुरूच होते दुपारचे ४ वाजेले तरी वीज विस्कळित होती.
विजसुरळीत करणे कामी वीज यंञना कामाला लागली असून विजपुरवठा सुरळीत करणे कामी युद्धपातळीवर काम चालू असल्याचे विश्वसनीय सुञांनी सांगीतले.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.