loader image
[ays_poll id=7]

संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज – सुनीता राजगिरे

Nov 29, 2023


मनमाड – “सृष्टीतील सर्व प्राणीमात्रात मानव प्राणी श्रेष्ठ आहे आणि मानव प्राण्यात स्त्री ही पुरुषापेक्षा जादा श्रेष्ठ आहे. कारण ती पुरुषापेक्षा जादा काम करते. परंतु पुरुषप्रधान समाज व्यवस्थेने धार्मिक पोथ्या पुराणातील कायद्यांनी तिला गुलामित ठेवलेले आहे. म्हणूनच स्त्रियांना या गुलामीतून मुक्ती देण्यासाठीच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. तेच आद्य शिक्षक आहेत,” असे प्रतिपादन सत्यशोधक चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्या सुनीता राजगिरे यांनी केले.
मनमाड जनहित विकास संस्था आणि मनमाड बचाव समिती यांच्यातर्फे आयोजित महात्मा फुले स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सुनिता राजगिरे बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की,” स्त्री शिक्षणाचा पाया रचून संपूर्ण समाजाला समतेच्या वाटेवर नेण्याचे महान कार्य करणारे महात्मा फुले खऱ्या अर्थाने समाज क्रांतिकारक असून त्यांचा समतेचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा मुख्य गाभा बनविलेला आहे. म्हणून संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. ”
कार्यक्रमात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र कांबळे, पंचशील वाचनालयाचे संचालक एस. एम. भाले यांनीही आपले विचार मांडले. आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ गायक अर्जुन साळवे यांनी सामाजिक समतेची गीते गायली. प्रास्ताविक सुशांत केदारे आणि आभार अशोकआप्पा परदेशी यांनी प्रदर्शित केले. संयोजन रामदास पगारे यांनी केले. यावेळी शंकर सानप,शरद बोडके,मोतीराम भालेराव, गौतम कर्डक, सूर्यकांत राजगिरे, श्री.आव्हाड, राजेंद्र धिंगाण, पांडे बाबूजी, मनोहर जगताप, श्री. घुगे आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.