मनमाड शहरातील दोन भागांना जोडणारा रेल्वे पुल आज पहाटे कोसळल्याने सतत वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावरील वाहनांची वाहतूक चांदवड, लासलगाव मार्गे वळविण्यात आली असली तरीही या पुलाचा वापर करून दर रोजची ये जा करणाऱ्या कॅम्प, शांती नगर, अयोध्या नगर, 28 युनिट, आनंदवाडी परिसरातील नागरिकांना शहरात येण्यासाठी गर्डरशॉप परिसरातील एक लहान पादचारी पुलाचा वापर करावा लागत आहे. मात्र हा पादचारी पुल ही जुना असून पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांसाठी असून ह्या पादचारी पुलावरून आज सकाळ पासून दुचाकी स्वारांची रांगच रांग बघावयास मिळत आहे. हा पादचारी पुल रेल्वे मार्गाच्या अगदी वरतून दोन भागांना जोडणारा पुल असून अचानक ह्या पुलावर दुचाकी वाहनांची वर्दळ वाढल्याने ह्या परिसरातील नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर ह्या पादचारी पुलावरील दुचाकी वाहनांची वाहतूक थांबविणे अपेक्षित आहे अन्यथा हा पुल ही कधीही कोसळू शकतो असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंचा दबदबा
पाच सुवर्ण दोन रौप्य व दोन कांस्यपदकासह उत्कृष्ट कामगिरी कृष्णा व्यवहारे व श्रावणी पुरंदरे साहिल...











