loader image
[ays_poll id=7]

धुळे मुंबई एक्सप्रेसला मनमाडकरांसाठी तीन अतिरिक्त बोगी राखून ठेवाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Dec 6, 2023


मनमाड रेल्वे स्थानक महत्त्वपूर्ण जंक्शन असून या स्थानकातून रोज नाशिक मुंबई आदी ठिकाणी मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. रेल्वे प्रशासनाने मनमाड करांची हक्काची गाडी मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस बंद करून त्याऐवजी धुळे दादर ही एक्सप्रेस सुरू केली. धुळे येथूनच गाडीत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने मनमाड, लासलगाव नाशिक येथील प्रवाश्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो.
याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अतिरिक्त डबे या गाडीला जोडून मनमाड येथे हे डबे खोलण्यात यावे अशा मागणीचे निवेदन मनमाड स्टेशन प्रबंधकांना देण्यात आले.मनमाड करांची हक्काची गाडी ही बंद होणार आणि धुळ्याहून गाडी सुरू होणार असे संकेत धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिल्यानंतर त्या ठिकाणाहून धुळे दादर ही एक्सप्रेस सुरू झाली तर दुसरीकडे या मतदारसंघाच्या खासदार केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या मतदारसंघातच नांदगाव तालुका असल्याने या मतदारसंघातील अनेक गाड्या यापूर्वी बंद झाले आहेत दुसऱ्या जिल्ह्यातील खासदार त्या मतदारसंघातून नव्याने गाड्या सुरू करत असून मनमाडकरां साठी नवीन गाडी सुरू होणे तर दूर राहिले हक्काच्या गाड्या बंद झाल्या आहेत. धुळ्याहून येणारी भरून येत असल्याने मनमाड, व परिसरातील प्रवाशांसाठी तीन अनारक्षित डबे मनमाड मध्येचं खोलण्यात यावे अशी मागणी विभागीय महाव्यवस्थापनकडे करण्यात आली असून या आशयाची निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर पाटील यांनी दिले. त्यांच्या समवेत मनुभाऊ परदेशी अरविंद भाऊ काळे, राजाभाऊ करकाळे आदी उपस्थित होते.
सदर निवेदन स्टेशन प्रबंधक नरेश्वर यादव स्वीकारल्यानंतर त्यांनी तातडीने धुळा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत तातडीने हा प्रश्न सोडवण्यासाठी आणखी तीन बोग्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहु असे आश्वासन दिले. स्टेशन मॅनेजरशी भेट घेण्यासाठी नानाभाऊ भालेराव यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केले.


अजून बातम्या वाचा..

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.