मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली.
महापुरुषांनी दिलेल्या योगदानामुळेच आज भारतीय समाजाचा विकास झालेला आहे. परंतु आज संपूर्ण भारतीय समाजालाच या महापुरुषांच्या विचाराकडे नव्याने आपल्या विचारांची मशागत करून बघणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन डॉ मिलिंद अहिरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त ते बोलत होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. किमान कौशल्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. पी के बच्छाव यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागाचे प्रा संदीप ढमाले यांनी केले.
मनमाड शहरात प्रथमच मनमाड सेल्स युनियन या संघटनेची स्थापना
मनमाड :- मनमाड शहरात प्रथमच मनमाड सेल्स युनियन या संघटनेची स्थापना करण्यात आली असून नाशिक...











