नांदगाव : मारुती जगधने
कांदाअनुदान, दुष्काळी अनुदान, अवकाळी पाऊस व गारपिट अनुदान,निर्यातबंदी, नाफेड मार्फत कांदा खरेदी केलेली घोषणा, हमीभावापेक्षा कमी दराने विकला जाणारा कापूस ,दुष्काळातून वगळलेली महसूल मंडळे, पीकविमा,पाणीपुरवठा व चारा छावणी इत्यादी अनेक समस्यांना तोंड देताना बळीराजाची व्यथा जर शासन/ प्रशासन समजुन घेत नसेल आणि फक्त घोषणा करून तोंडाला पाने पुसली जात असतील तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँगेस पक्ष, किसान सेल बेमुदत उपोषण करेल असा इशारा किसान सेल तालुकाध्यक्ष निलेश चव्हाण यांनी दिला आहे.
मा.तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले प्रमाणे राज्य सरकारने फेबुवारी मार्च महिन्यानत विक्री केलेल्या कांद्याला ३५० रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केले होते. आज नऊ महिने उलटून गेले तरी एकदोन हप्त्यात दहा-दहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले व उर्वरित रक्कम उद्यापही शेतकऱ्याना मिळाली नाही. तरी शासनाने त्वरित राहिलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, तसेच केंद्र सरकारने NCCF व नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. परंतु नांदगांव तालुक्यात कोणती कंपनी कांदाखरेदी करते कुठे खरेदी करते याची शेतकऱ्यांना माहीती नाही. शेतकरी वर्गामध्ये NCCF व नाफेड च्या खरेदीबाबत संभ्रम आहे. शासनाने जाहीर केलेली खरेदी फक्त कागदावरच आहे. एकाही शेतकऱ्याचा एक क्विंटल कांदा खरेदी केलेला नाही मग खरेदी नक्की कुणाची हा प्रश्न निर्माण होतो. नांदगाव तालुक्यातील NCCF व नाफेडच्या केंद्राद्वारे सुरु असलेल्या खरेदीत पारदर्शकता यावी तसेच केंद्र शासनाने जाहीर केलेली कांदा निर्यातबंदी तात्काळ मागे घ्यावी इत्यादी मागण्याचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे.
कापुस हमी भावापेक्षा कमी दराने विकला जात असून, तूर आणि उडीद संदर्भात मुक्त आयात धोरण राबवित शेतकऱ्यांचा बाजारात येणाऱ्या मालाचे भाव पाडण्याचे कारस्थान रचले आहे.
तालुक्यातील वगळलेली दुष्काळसदृश्य ३ महसूल मंडळे ह्या संदर्भात खुलासा व कार्यवाही व्हावी, दुष्काळामुळे असलेली चारा टंचाई वर तोडगा म्हणून शेजारच्या तालुक्यातून मोठ्या कष्टाने जमा केलेला चारा अवकाळी पावसामुळे खराब झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे अशा परिस्थितीत तालुक्यात ठिकठिकाणी तातडीने चारा छावणी उभारली जावी ह्या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा रस्तारोको, बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी निलेश चव्हाण ज्ञानेश्वर निकम दत्तात्रय जाधव राकेश चव्हाण अण्णा महाजन भूषण महाजन हेमंत चोळके कुणाल बोरसे उपस्थित होते.
मनमाडला अंडरपास व फ्लायओवरची अत्यंत गरज : आ.कांदे यांची रेल्वे बोर्डाला मागणी
मनमाड- दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी नांदगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सुहास कांदे यांनी रेल्वे...











