loader image
[ays_poll id=7]

नांदगांव येथे भाजपा महिला मोर्चा तर्फे सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी

Jan 3, 2024


 

नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगांव शहरातील महात्मा ज्योतिबा फुले चौक येथे माता सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीस महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास आणि तदनंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना पुष्पहार व पुष्प अर्पण करुन करण्यात आला.
सदर कार्यक्रमात बोलताना भाजपा च्या माजी प्रदेश उपाध्यक्षा ॲड जयश्रताई दौंड म्हणाल्या समस्त स्त्री वर्गास शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या माता सावित्रीबाई यांनी मुलींच्या, महिलांच्या शिक्षणाचे महत्त्व जाणुन कित्येक स्त्रियांना प्रेरीत केले, त्यांनी महीलांसाठी पुण्यात भारतातील पहिली शाळा सुरु केली आणि त्या भारताच्या प्रथम शिक्षिका झाल्या, त्यांचीच प्रेरणा घेऊन पुढे फातिमा शेख यांनी देखील शिक्षिका प्रशिक्षण घेऊन आणि पदवी प्राप्त करून भारताच्या पहिल्या मुस्लीम महीला शिक्षिका झाल्या.
तसेच भाजपा शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर म्हणाले लवकरच पुण्यात माता सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केलेल्या जागेवर महायुती सरकार तर्फे एक भव्य सुशोभित असे स्मारक होणार आहे आणि त्या निमित्ताने आज च्या युगातील मुलींना व महिलांना, माता सावित्रीबाई यांचा लढा व त्यातुन प्रेरणा मिळणार आहे. आणि हीच माता सावित्रीबाई फुले यांना खरी श्रद्धांजली असणार आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन भाजपा महीला मोर्चा तर्फे करण्यात आले. कार्यक्रमा वेळी जयश्रीताई दौंड, राजाभाऊ बनकर, दिपक पाटील, सतिष शिंदे, मनोज शर्मा, गणेश शर्मा, अन्नपूर्णा जोशी, तारा शर्मा, धम्मवेदी बनकर, अमोल चव्हाण, काजल जाधव, परवीन शेख, सरला गोखने, कविता माले, उज्वला लोखंडे, संगीता बागुल, जिजाबाई परदेशी, लता अडकमोल, रेखा सोनवणे, सुमन जाधव, गरुड ताई, जाधव ताई, उषा सोरे आदी महीला उपस्थित होत्या.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.