मनमाड – नांदगाव मतदार संघ व मनमाड शहर व ग्रामिण भागात दुष्काळी परिस्थती असल्यामुळे सर्वत्र शेतकरी व्यवसाय व इतर व्यवसाय हे ठप्प पडलेले आहेत. व्यापारी व नागरीक या दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदील झालेले आहेत. त्यामुळे सर्वच क्षेत्रात पैश्याची अत्यंत चणचण आहे. अशा परिस्थितीत मार्च एन्ड सुरु होणार असुन सदर काळात शासकीय वसुली होणे बंधनकारक असते. तरी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता ग्राहकांकडे सद्यस्थिती जेवढे पैसे आहेत तेवढे भरुन घ्यावे व इतर उर्वरीत पैश्यांसाठी मुदत देणेत येऊन सदर रक्कमांचे हप्ते करुन द्यावे जेणेकरुन
वीज वितरण कंपनीस देखिल काही तोटा न होता ग्राहकांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळेल. तसेच सध्या 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचे परिक्षेचा काळ सुरु होणार असुन, 10 वी
व 12 वी हा त्यांचे भविष्याचा व महत्वाचा टप्पा आहे सदर परिक्क्षेस विद्यार्थ्यांना होवु नये म्हणुन क ांच्या परिक्षा सुरु होणेपुर्वी आपले कंपनीचे ज े काही कामे असतील ते करुन घेणेत यावे, जेणे करुन विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागणार नाही. सदरील बाबीबाबत आपले स्तरावरुन योग्यती पुढील कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना देण्यात आले.
निवेदनावर प्रविण नाईक
सहसंपर्क प्रमुख,
सुनील पाटील जिल्हा समन्वयक,
गणेश जगन्नाथ धात्रक जिल्हा प्रमुख,
संजय कटारीया जिल्हा संघटक,
संतोष गुप्ता तालुका प्रमुख,
संतोष बळीद जिल्हा उपप्रमुख,
माधव शेलार मनमाड शहर प्रमुख,विलास कटारे, संतोष सांगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. याप्रसंगी लियाकत शेख,विजू मिश्रा,युवा सेनेचे सनी फसाटे, इरफान शेख आदी उपस्थित होते.
श्रीराम जन्मोत्सव निमित्त मनमाडला बुधवारी बैठकीचे आयोजन
मनमाड- सालाबादप्रमाणे 1986 पासून सलग 40 व्या वर्षी यंदाही श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे...











