loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सौंदाणे यांनी केली पाहणी

Feb 29, 2024


नांदगाव आणि मनमाड शहरासह ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, सदर परिस्थितीची माहिती मिळताच तहसीलदारांशी संपर्क साधून यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केल्या.
शहर परिसरासह ग्रामीण भागात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान केले. यामध्ये रब्बी पिकातील मका डाळिंब, शेवगा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची माहिती घेऊन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यानंतर आज आमोदे या गावी तहसीलदार सुनील सौंदाणे, कृषी अधिकारी गाडे, आमदार सुहास आण्णा कांदे यांचे प्रतिनिधी युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे, प्रकाश शिंदे यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
आमोदे येथील शेतकरी विठ्ठल पुंडलिक पगार,संजय पगार बाबाजी पगार, गणेश पगार, यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मका, डाळिंब शेवगा,पिकांची प्रतिनिधिक स्वरूपात पाहणी करून सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या आहेत.
आमोदे येथील सरपंच सौ वैशाली पगार, सदस्य विठ्ठल पगार, उपसरपंच भूषण पगार,कृष्णा पगार, रामकृष्ण पगार, समाधान पगार,वाल्मीक पगार, तलाठी तुषार येवले,कृषी सहाय्यक राहुल जैन आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे आमदार सुहास आण्णा कांदे हे मुंबई ला असून मनमाड नांदगाव शहरासह मतदारसंघात जोरदार पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या त्यांनी सूचना तहसीलदारांना दिल्या , तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सहसंबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची माहिती देऊन मदत देण्याची मागणी केली आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.