loader image
[ays_poll id=7]

नांदगाव बाजार समिती सचिवाचीं बोलठाण येथील व्यापारी  बांधवाना दमबाजी. प्रहार शेतकरी संघटनेचे संदिप सुर्यवंशी यांनी केला जाहीर निषेध

Apr 9, 2024




नांदगाव  सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील व्यापारी बांधवाना नांदगाव बाजार समितीचे सचिव अमोल खैरणार यांनी  कांदा लिलाव संर्दभात फोनवर धमकी दिल्याने प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख संदिप सुर्यवंशी यांच्या कडून जाहीर निषेध व विष प्राशन करूण आत्महत्या करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  याबाबत सविस्तर वृत असे की
नासिक जिल्हातील बाजार समित्या १५ दिवसापासून बंद असल्याने सोमवारी दिनांक ८ रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नासिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संबधीत घटकांची मिटींग होऊन सदर मिटींग कुठल्याही निर्णयावीणा संपूष्टात आली.
   मंगळवार दि. ९ रोजी जिल्हाभरातील विविध बाजार समितीतील व्यापारी बांधवानी तात्पुरता पर्याय म्हणून शेतकरी बांधवाना आवाहन करूण खाजगी जागेत  कांदा लिलाव  सुरू करूण कुठल्याही प्रकारची हमाली,तोलाई,वाराई कपात न करता शेतकरी बांधवाना रोख स्वरूपात पेमेंट केले. याच प्रकारे बोलठाण ता. नांदगाव येथील व्यापारी बांधवानी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख संदिप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बोलठाण येथे कांदा लिलाव सुरू केला असता नांदगाव बाजार समितीचे सचिव अमोल खैरणार यांनी बोलठाण येथील  व्यापारी श्री गौकुळशेट कोठारी यांना फोन वरूण इशारा वजा धमकी देत तुम्ही हा लिलाव बंद करा . नाहीतर मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करेल,तुमचे परवाने रद्द करेल अशी धमकी दिली . त्यावेळेस त्या ठिकाणी असलेले प्रहार शेतकरी संघटनेचे संदीप सुर्यवंशी यांनी सचिवानां फोन वर सांगितले की तुम्ही १५ दिवसापासून बाजार समित्या बंद करूण ठेवल्या आहे . आमच्या शेतकरी बांधवानी कांदे कुठे विकायचे . तुम्ही जर व्यापारी बांधवा वर कायदेशीर कारवाई केली व आमच्या कांदा लिलावास विरोध केला तर मी व माझ्या सह येथील सर्व शेतकरी विषप्राशन करूण घेवू व यास  बाजार समिती सभापती, सचीव हे जबाबदार राहतील व या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.