loader image

अखेर वन विभागाने घेतली तहानलेल्या प्राण्यांची दखल

Apr 27, 2024


मनमाड – चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील भागवत झाल्टे
यांनी वारंवार वन विभागाकडे जंगली पशु प्राण्यांसाठी पानवट्या मध्ये पाणी टाकण्यासाठी टँकरच्या पाण्याची मागणी केली होती त्याची वन विभागाने तात्काळ दखल घेऊन दुसऱ्याच दिवशी दोन टँकर पाणी टाकले त्यामुळे वन्य प्राण्यांना जीवदान मिळाले.येवला तालुक्यातील सावरगाव येथे हि हरिणांसाठी व जंगली प्राण्यांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करुवी येथे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे वन्य प्राण्यांच्या संख्येवरून आवश्यक त्या ठिकाणी पानवठे उपलब्ध करून द्यावा
तसेच जागोजागी कुंड्यांची निर्मिती करून द्यावी जवळ असलेले चांदवड तालुक्यातील समिट स्टेशन जवळील जंगलात शंभर पेक्षा हरणांची संख्या वाढली आहे तिथेही पाण्याची सुविधा त्वरित करावी व तेथील पाण्याचा साठा सध्या खराब होऊन गेल्यामुळे तेथील हरणांना पाण्याची सुविधा लवकरात लवकर करण्यात यावी त्यामुळे कातरणी तळेगाव समिट वडगाव परिसरात हरणे मोठ्या प्रमाणात मानवी वाड्या- वस्तीकडे पसरत आहे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो झालास तर याला कोण जबाबदार राहतील या मागणीची त्वरित दखल घेऊन आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी पाणवठे उपलब्ध करून देण्यात यावे व वेळोवेळी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.


अजून बातम्या वाचा..

टूरिस्ट बसला आग; प्रवासी बाल-बाल वाचले- नांदगाव मालेगाव रोडवर पहाटे  अग्नी तांडवचा थरार

टूरिस्ट बसला आग; प्रवासी बाल-बाल वाचले- नांदगाव मालेगाव रोडवर पहाटे अग्नी तांडवचा थरार

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव मार्गावर चालणार्या वाहनांचा लहान मोठ्या अपघातांचा शिलशिला चालूच...

read more
खेलो इंडियामध्ये (मनमाड)नाशिकचे वर्चस्व… मनमाडच्या मेघाला सुवर्ण तर कृष्णाला कांस्य

खेलो इंडियामध्ये (मनमाड)नाशिकचे वर्चस्व… मनमाडच्या मेघाला सुवर्ण तर कृष्णाला कांस्य

चेन्नई : येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या मेघा आहेरने...

read more
.