loader image
[ays_poll id=7]

नांदगाव – वेहळगाव रोडवर वादळाने पडलेले झाड ठरतोय रहदारीला अडथळा

May 16, 2024


 

नांदगाव : मारुती जगधने दि ५ मे रोजी नांदगाव तालुक्यात प्रचंड वादळ वारा आणी गारांचा पाऊस बरसला या वादळात रस्त्यावर आनेक झाडे कोसळली जी झाडे तोडून घेऊन जाण्या जोगी होती अशी अनेक झाडांचा फांद्या स्थानिक रहिवाशांनी तोडून घेऊन गेले परंतु जी झाडे मोठी व निरमनुष्य ठिकाणी आहेत अशी झाडे आजुन ही रस्त्यावर पडून आहेत नांदगाव वेहळगांव रोडवर सारताळे निमतळे शिवारात एक मोठे बाभळीचे झाड रस्त्यावर आडवे पडले आहे ते रहदारीला अडथळा होत आहे या रस्त्यावर आडवे पडलेल्या झाडामुळे अपघाताची दाट शक्यता आहे .
नांदगाव वेहळगाव हा रस्ता वर्दळीचा असल्याने वाहनांची वाहतूक अधिक असते पण सारताळे निमतळे या ठिकाणी रस्त्यावर आडवे पडलेले बाभळीचे झाड आजुन सार्वजनिक बांधकाम विभागाने हाटवले नाही .ते आता रहदारीला अडथळा निर्माण करीत आहे १२ दिवस झाले पण आजुन सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग न आल्याने झाड रस्त्यावर आडवे पडून आहे दुचाकी वगळता इतर सर्वच चारचाकी व अवजड वाहनांना हे झाड अडसर ठरत आहे राञीच्या वेळेला आनेक जण झाडावर जाऊन आदळतात यातुन मोठा अपघात होण्याची शक्यता आहे ? या मार्गावर वेहळगांव, तळवाडे साकोरा, मुळडोंगरी, जामदरी कळदरी, गिरणाडँम, मगळगांव, पिलखोड, पळाशि,सावरगांव, आदी गावांचा समावेश आहे .दरम्यान याच मार्गावर नांदगाव रेल्वेमाल धक्क्याजवळ एक मोठे झाड वादळात पडले होते ते स्थानीकानी फांद्या तोडून घेउन गेले. तसेच उड्डान पुलाजवळ व मोरखडी बंधार्या जवळ वेहळगाव रस्त्यावर आडवे पडलेले झाड तुकाराम सोनवने या रहिवाशांनी बाभळीचे आडवे पडलेले झाड तोडून बाजूने केले व रहदारीला रस्ता मोकळा केला. परंतु निमतळे सारतळे लगत पडलेले झाड आजुन तसेच रस्त्यावर पडून आहे .
५ मे रोजी नांदगाव वेहळगांव रोडवर पडलेले झाड आजुन सार्वजनिक बांधकाम विभागाने हाटवले नाही यामुळे अपघातात होईल तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येईल का? असा सवाल राजेंद्र सावंत शेतकरी सावरगांव यांनी केला आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.