मनमाड – चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही शेतकरी बांधवांनी आणि तरुणांनी कांद्याला भाव नसल्याने निषेध म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले असता गेटवरवरच पोलिसांनी त्यांना अडवत गळ्यातील कांद्याच्या माळा काढण्यास सांगितले. त्यानंतर या शेतक-यांचा पोलिसांबरोबर वाद झाला. त्यानंतर अखेर गळ्यातील माळा काढून ठेवत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
इको गाडी आणि दुचाकीचा अपघात – मनमाड च्या दोन तरुणांचा अपघाती मृत्यू
मनमाड - मनमाड लासलगाव रोडवर रायपूर गावानजीक खंडेराव मंदिराजवळ दुचाकी व इको गाडीचा समोरासमोर धडक...











