loader image
[ays_poll id=7]

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

Aug 17, 2024


मनमाड – शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट रोजी दुपारी हिरा लॉन्स येथे प्रमुख अतिथी डॉ.संजय सांगळे,डॉ. सुनील काजीकर, प्रवीण व्यवहारे सर,पी.एस.आय. परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालेला आकाश विंचू ,सौ. पूनम मढे मॅडम, गजानन नागरे सर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी क्लासेसच्या १५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार क्लासेस तर्फे करण्यात आला,याप्रसंगी पहिल्याच प्रयत्नात व महराष्ट्रातील 9 वा क्रमांक मिळविणारा विद्यार्थी आकाश विंचू यांचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.संजय सांगळे,डॉक्टर कजिकर , प्रवीण व्यवहारे सर व क्लासेसचे संचालक श्री डॉक्टर भागवत दराडे यांनी केला. डॉ.संजय सांगळे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून स्वप्न पूर्ण केले पाहिजे,विद्यार्थ्यांनी व्यवसायिक शिक्षणाची माहिती घेऊन त्यात प्रगती करावी , मोबाईल अतिरेक टाळावा तसेच मुलींनी पण मागे न राहता उच्च शिक्षण पूर्ण करावे ,विविध क्षेत्रात पुढे आले पाहिजे असे आपल्या भाषणात सांगितले तसेच क्लासेसच्या प्रगतीबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी मनमाड केंद्रातून प्रथम ,द्वितीय ,तृतीय तसेच सर्वच विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . आकाश विंचू यांनी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून शालेय अभ्यासक्रम बरोबर खेळाची आवड जोपासावी असे सांगितले.
श्री प्रवीण व्यवहारे सरांनी सांगीतले की शिक्षणाला खेळाची जोड दील्यास शारिरिक विकासाबरोबर मानसिक विकास होतो .
गजानन नागरे सर व मढे मॅडम यांनी क्लासेसला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्याचे स्वागत क्लासेस चे गणित विभागाचे प्रमुख प्रा अमोल सानप सर यांनी केले तसेच प्रमुख अतिथींचा परिचय प्राध्यापक राहुल गुंडगळ सर यांनी करून दिला, आभार प्रदर्शन क्लासेसच्या संचालिका प्रा.सौ. भाग्यश्री भागवत दराडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लासेसचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली .


अजून बातम्या वाचा..

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.