loader image
[ays_poll id=7]

राज्यात धनगर समाज आंदोलकासह शेळ्या मेंढ्या सामील रास्ता रोकोने चक्का जाम

Sep 24, 2024


नांदगाव : मारुती जगधने हातात पिवळा ध्दवज घेऊन शेकडो आंदोलक मेंढ्या सोबत रस्त्यावर आंदोलनास सज्ज झाले होते या दरम्यान जय मल्हार चा जयघोष करीत आंदोलक आक्रमक झाले होत ते आपल्या मागण्यावर ठांम होते. एका बाजूला आंदोलक तर दुसर्या बाजूला शेकडो पाळीव. शेळ्या – मेंढ्या ना देखील आंदोलनात सामील केले होते.आसे हे आगळे वेगळे आंदोलन पोलिसांनी संयमाने हाताळले.
दि २३ रोजी राज्यात धनगर समाजाच्या वतीने विविध मागण्यासाठी सर्वञ
रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले यामुळे राज्यातील आनेक प्रमुख शहरातील व रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता.नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

धनगर समाजाच्या वतीने नांदगांव येथे एकञ येऊन मागण्यासाठी रास्ता रोको केला सुमारे ४० मिनीटे हा रस्ता रोको हुतात्मा चौकात चालू होता. यावेळी दुतर्फा सुमारे दिड ते दोन किमी अंतर वाहनांची रांग लागली होती नंतर रस्ता रोको स्थगित करण्यात आल्या यावेळी पोलिसांना बराच वेळ वाहतूक सुरळीत करण्यास लागला.
धनगर समाजाच्या मागण्या विविध स्तरांवर आहेत, मुख्यत्वे त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी आहेत. खाली काही महत्त्वाच्या मागण्या दिल्या आहेत:नाशिक जिल्ह्यात सर्वच तालुकास्तरावर हे आंदोलन छेडणयात आले याचे परीणाम रस्ता वाहतुकीवर झाले .प्रवासी गाड्या, खाजगी वाहने मालवाहु ट्रक अॅटो,इतर लहान मोठी वाहने रस्तारोकोने थांबुन होती जिल्हायात नांदगांव नाशिक, बागलाण,
,मालेगांव ,येवला, सह सर्वञ आंदोल छेडले गेले.
1. आरक्षण: धनगर समाजाची प्रमुख मागणी म्हणजे अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात आरक्षणाची मागणी. सध्या त्यांना इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षण आहे, परंतु ST आरक्षणामुळे त्यांना अधिक फायदे मिळतील असे समाजाचे मत आहे.

2. शैक्षणिक सुविधा: शाळा-कॉलेजांमध्ये धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, स्कॉलरशिप आणि इतर शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, अशी मागणी केली जाते. यामुळे समाजातील तरुणांना उच्च शिक्षण घेण्यासाठी उत्तेजन मिळेल.

3. आर्थिक विकासासाठी योजना: धनगर समाजाला शेती, पशुपालन, तसेच लघु उद्योजकतेसाठी विशेष आर्थिक सहाय्य, सबसिडी आणि कर्ज सुविधा पुरविण्याची मागणी आहे. यामुळे समाजाचा आर्थिक विकास होईल.

4. सामाजिक सन्मान: धनगर समाजाच्या परंपरा, संस्कृती आणि ऐतिहासिक योगदानाला मान्यता मिळावी आणि त्यांच्या सन्मानासाठी विशेष कार्यक्रम किंवा धोरणे राबवावीत, अशीही मागणी आहे.

5. राजकीय प्रतिनिधित्व: स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवर राजकीय प्रतिनिधित्व वाढावे आणि समाजाच्या मागण्या अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांना योग्य जागा मिळावी, अशी अपेक्षा आहे.
नांदगांव येथे पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी व त्यांच्या सहकार्यांनी आंदोलन शांतपणे हताळले
दरम्यान धनगर समाजाने केलेल्या मागण्या
समाजाच्या एकूण प्रगतीसाठी महत्त्वाच्या आहेत आणि त्या पूर्ण झाल्यास धनगर समाजाची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थिती सुधारेल.


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
.