loader image
[ays_poll id=7]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

Apr 10, 2025


मनमाड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ चित्ररथांना रोख पारितोषिके देण्यात येणार असल्याची घोषणा भीमोत्सव समितीने केली आहे. या स्पर्धेचे पारितोषिक रक्कम असेल – प्रथम क्रमांकास 11,000 रुपये, द्वितीय क्रमांकास 7,000 रुपये, तृतीय क्रमांकास 5,000 रुपये आणि सर्व विजेत्यांना ट्रॉफी देण्यात येईल. ही स्पर्धा डॉ. आंबेडकर यांच्या विचारधारेचा प्रचार करण्यासाठी आणि समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यासाठी आयोजित केली जात आहे.

मनमाड शहराचा भीमोत्सव हा अत्यंत प्रसिद्ध आहे. या उत्सवात विविध सामाजिक, सांस्कृतिक, शाहिरी, व्याख्याने, आणि पोवाडे कार्यक्रम सादर केले जातात. मनमाड शहर हे आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. येथे मोठ्या प्रमाणात आंबेडकर अनुयायी राहत असल्यामुळे ही चळवळ विविध कार्यक्रमांतुन दिसून येते. डॉ. आंबेडकर यांच्या विचारधारेचा प्रचार करण्यासाठी आणि समाजातील समतेचा संदेश पोहोचवण्यासाठी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

डॉ आंबेडकर जयंतीच्या दिवशी, मनमाड शहराच्या प्रत्येक वार्डातून आणि चौकातून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली जाते. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित मिरवणुकीत चित्ररथ काढले जातात. चित्ररथ तयार करण्याची तयारी एक महिन्याच्या अगोदरच सुरू होऊन, विविध देखावे तयार करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते मोठ्या मेहनतीने काम करत असतात. सुंदर आणि अर्थपूर्ण देखावे तयार करण्यासाठी त्यात प्रचंड मेहनत घेतली जाते. यासाठी मोठा खर्चही केला जातो, कारण प्रत्येक चित्ररथ आणि देखाव्याची सजावट, बांधणी, आणि त्यावर असलेल्या संदेशांना महत्व दिले जाते.

अशा उत्कृष्ट चित्ररथांना गौरविण्यात यावे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने रोख पारितोषिके देण्यात येतात. यंदाही उत्कृष्ट चित्ररथाला प्रथम क्रमांकास 11,000 रुपये, द्वितीय क्रमांकास 7,000 रुपये, तृतीय क्रमांकास 5,000 रुपये आणि ट्रॉफी देण्यात येणार असल्याची घोषणा समितीने केली आहे. या पुरस्कारांचे वितरण १७ एप्रिल रोजी होणाऱ्या महानाट्य कार्यक्रमामध्ये केले जाणार आहे. हे पारितोषिक चित्ररथ स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना त्यांच्या श्रमांचा आणि कलेचा आदर ठरणार असल्याची माहिती भीमोत्सवचे राजेंद्र पगारे, दिनकर धिवर, अनिल निरभवणे, अमोल खरे, संजय कटारे, निलेश वाघ, डॉ जालिंदर इंगळे यांच्यासह सर्व सदस्यांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.