loader image
[ays_poll id=7]

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

Jul 5, 2025


 

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी — भक्ती, समर्पण आणि माणुसकीचं अनोखं पर्व!

ही वारी म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी चालत जाणारी श्रद्धेची सागरयात्रा. या यात्रेत जात-पात, वय-लिंग, धर्म, आर्थिक स्तर, सर्व सीमारेषा नष्ट होतात. “माऊली… माऊली…” चा जयघोष करत लाखो वारकरी भजन-कीर्तनात रंगतात, भक्तीभावात न्हालेलं असतं संपूर्ण महाराष्ट्र!

याच भक्तिसागरात एक वेगळा आणि संवेदनशील संदर्भ नूतन माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक श्री. देव हिरे यांनी शालेय दर्शनी फलकावर उभा केला. रंगीत खडूच्या माध्यमातून त्यांनी तृतीयपंथीय (किन्नर) समाजाचे वारकरी वारीतील समर्पण प्रभावीपणे चितारले.

समाजाने अनेकदा दूर लोटलेल्या किन्नर समाजाला वारीने विठ्ठलाच्या चरणाशी स्थान दिलं. माऊलीने स्वीकारलं!
वारीत सहभागी झालेले हे तृतीयपंथीय ज्या श्रद्धेने विठू नामात तल्लीन झाले, त्याला सारा महाराष्ट्र नतमस्तक झाला — “माऊली… माऊली…” च्या गजरात त्यांना सामावून घेतलं.

हा फलक म्हणजे केवळ कलाकृती नव्हे, तर सामाजिक संदेश देणारी जागृती आहे!
तृतीयपंथीयांचाही समाजात सन्मानाने सहभाग असावा, यासाठी हिरे सरांनी रंगरंगोटीच्या माध्यमातून दिलेला हा अभिव्यक्तीचा ठोस प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण सर्वांनी हीच प्रार्थना करूया —
“पांडुरंगा, सर्व जीवांना समान सन्मान, स्वाभिमान आणि स्वीकार दे. तुझ्या चरणी कुणीही उपेक्षित राहू नये.”

विठू माऊलीचं दर्शन लाभो!
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

– नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव
कलाशिक्षक – देव हिरे सर


अजून बातम्या वाचा..

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
.