loader image
[ays_poll id=7]

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

Jul 12, 2025


नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागण

मारुती जगधने ,नांदगाव आणि मनमाड शहरातून राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरून दररोज हजारो वाहने ये-जा करत असल्यामुळे शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाहतूक दाटीमुळे अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी वळण रस्ता (बायपास रस्ता) तातडीने तयार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

 

याच मुद्द्यावर आमदार सुहास कांदे यांनी महाराष्ट्र विधानसभेत लक्ष वेधून घेतले. त्यांनी सरकारचे लक्ष वेधत स्पष्ट केले की, “नांदगाव आणि मनमाड या दोन्ही शहरांतून वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. शाळकरी मुले, वृद्ध नागरिक, व्यापारी वर्ग, व सामान्य नागरिक यांना याचा मोठा त्रास होत असून अपघातांमध्ये वाढ झालेली आहे.”

 

वळण रस्त्यामुळे होणारे फायदे:

 

शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल

अपघातांचे प्रमाण कमी होईल

इंधन आणि वेळेची बचत होईल

नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता वाढेल

व्यापारी व प्रवासी वाहनांना सुलभ मार्ग मिळेल

आमदार कांदे यांनी सरकारकडे या दोन्ही शहरांना वळण रस्त्याची तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली आहे आणि या कामासाठी आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.

 

स्थानिक नागरिकांनी देखील या मागणीचे स्वागत केले असून, “शहरात प्रचंड गर्दी होते, बायपास रस्ता झाला तर खूपच दिलासा मिळेल,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
.