loader image
[ays_poll id=7]

कॉ. माधवराव गायकवाड यांची वैचारिक एकनिष्ठता दीपस्तंभासारखी – भास्कर कदम

Jul 18, 2025


नांदगाव : कॉ. माधवराव गायकवाड यांचे व्यक्तिमत्व उतुंग होते, त्यांची वैचारिक एकनिष्ठता दीपस्तंभासारखी आहे. त्याचे कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे विचार नांदगावचे माजी नगराध्यक्ष भास्कर कदम यांनी त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
नांदगाव येथील छत्रपती पत संस्थेत कॉ. माधवराव गायकवाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाखा व्यवस्थापक देविदास नंद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी बाबूजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भास्कर कदम यांनी भाषणात नमूद केले की, आज वैचारिक एकनिष्ठता दुर्मीळ होत चालली आहे. कॉ. गायकवाड हे अखेरच्या श्वासापर्यंत कम्युनिस्ट पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. अनेकदा पराभव पत्करले; परंतु विचारधारेशी बेईमानी केली नाही. तळागाळातील माणसासाठी त्यांचा संघर्ष होता. आयुष्यभर त्यासाठीच लढा दिला. कॉ. बाबूजींचा प्रत्यक्ष सहवास लाभला हे आमचे भाग्य समजतो, असेही कदम यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी सांगितले.
आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन राहूल अहिरे यांनी केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नेमीचंद अग्रवाल, सलीमभाई शेख, धनराज अग्रवाल, अरबाज शेख, नाना पगार, दीपाली रत्नपारखी, शालिनी पगारे, भरत कासलीवाल, अशोक जाधव, रवींद्र पवार, मजहर खान, फकीर मोहंमद मन्सूरी, गिरीश कलंत्री यांचेसह सभासद उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
.