loader image
[ays_poll id=7]

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

Jan 13, 2026


फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेस मनमाड नगरपालिकेच्या महिला अधिकारी, उपमुख्याधिकारी सोफिया बागल व सहाय्यक नगररचनाकार रागिनी चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगरपालिकेचे अधिकारी किरण आहेर व रचनाकार रागिनी चव्हाण यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवन प्रवासावर आपले मनोगत व्यक्त केले.

राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांसमवेतच छत्रपती संभाजी महाराजांना देखील घडविण्याचे काम केले. जिजाऊंचे बुद्धीचातुर्य, युद्ध कौशल्य, समयसूचकता, धैर्य, निडरता व इतर अनेक गुणांचा दाखला त्यांच्या जीवनकार्यातून पाहायला मिळतो, आज देखील जीवनात अनेक बिकट प्रसंग येत असतात परंतु जिजाऊंच्या जीवनाचा अनुभव पाठीशी घेऊन मार्गक्रमण केल्यास कोणत्याही संकटास सामोरे जाणे व त्याचा पराभव करणे सोपे होऊ शकते, असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

यावेळी मंचचे मार्गदर्शक हाजी रफिक बाबूजी, हाजी शफी मुसा, एकरा गर्ल्स स्कूलचे संचालक एम.सलीम अहमद, जावेद शेख, रामदास पगारे, किरण पाटील, विकास गायकवाड, सद्दाम आत्तार, मतीन मन्सुरी, विलास कातकडे, सुनील दराडे, उमेश सोनवणे, आशा चव्हाण, मोहम्मद बोहरी, शितल जाधव, गोरख झाल्टे, शकूर शेख, अमोल बागुल, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन संयोजन मंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख यांनी केले, आभार प्रदर्शन सद्दाम आतार यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिष्टमंडळाकडून मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन

नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिष्टमंडळाकडून मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन

मनमाड :- नांदगाव मतदारसंघात यंदाच्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने प्रचंड दुष्काळाचे सावट निर्माण झाले...

read more
नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) वतीने उपोषणाचा इशारा…

नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) वतीने उपोषणाचा इशारा…

आज दि. ०४ नोव्हेंबर २०२३नांदगांव तालुक्यामध्ये या वर्षी सर्वात कमी पर्जन्यमान झालेले आहेत जून...

read more
नाशिक जिल्ह्याचा दुष्काळ ग्रस्त यादीत  समावेश करावा – डॅा. भारती पवार, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची मुंबईत भेट घेवुन केली मागणी

नाशिक जिल्ह्याचा दुष्काळ ग्रस्त यादीत समावेश करावा – डॅा. भारती पवार, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची मुंबईत भेट घेवुन केली मागणी

मुंबई: राज्यात जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाने फिरविलेली पाठ, त्यामुळे भूजलाची कमतरता, पेरणीखालील...

read more
.