loader image
[ays_poll id=7]

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

Feb 25, 2026


​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने

आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता. नांदगाव) येथील चाळीसगाव-नांदगाव रोडवरील टोल नाका शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या तीव्र आंदोलनानंतर बंद पाडण्यात आला. महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेनेच्या कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी हे पाऊल उचलण्यात आले.

​नेमके प्रकरण काय?

​गेल्या अनेक दिवसांपासून या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना अत्यंत तुटपुंजा पगार दिला जात आहे. वारंवार मागणी करूनही व्यवस्थापनाने पगारवाढीकडे दुर्लक्ष केले. तसेच राष्ट्रीय महामार्गाची अवस्था दयनीय झाली असून रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणचे पथदीप (Street Lights) बंद असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चांदवड-मनमाड आणि नांदगाव-चाळीसगाव या रस्त्यावर दुतर्फा काटेरी झाडे आत मध्ये आलेली आहे, ती वाहतुकीला अडथळे ठरत आहेत, अनेक दुभाजकांवर काटेरी कुंपण तयार झाले आहेत ते देखील वाहन धारकांना त्रासदायक ठरत आहेत, अनेकांना त्याचे तोंडाला फटके लागतात, अनेक वाहनांना ओरखडे तयार होतात .

​आंदोलनाचे नेतृत्व आणि इशारा

​युवासेना तालुका प्रमुख फरहान खान, कामगार विकास सेना अध्यक्ष सुनील जाधव आणि शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली टोल व्यवस्थापक गुप्ता यांना निवेदन देण्यात आले. “जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि रस्त्याची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत टोल वसुली बंद राहील,” असा आक्रमक पवित्रा यावेळी पदाधिकाऱ्यांनी घेतला.

​आंदोलनाप्रसंगी रवी देवरे, नूतन कासलीवाल, प्रकाश शिंदे, शशिकांत सोनवणे, बाबा ढोमसे, भाऊराव बागुल, अय्याज शेख, महेंद्र गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी आणि कामगार वर्ग उपस्थित होता.


अजून बातम्या वाचा..

मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

प्रतिनिधी मनमाड - येथील मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेमध्ये मंडळ श्रीमती इती पांडे...

read more
राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
.