loader image
[ays_poll id=7]

कलम १५५ च्या वापरावर राज्य सरकारकडून निर्बंध!

Sep 2, 2026


महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम १५५च्या अधिकाराच्या गैरवापराच्या घटना समोर आल्यानंतर राज्य सरकारने त्याच्या वापरावर निर्बंध घातले आहेत.
आता या कलमाचा वापर महसूल नोंदी, सातबारा किंवा भूमी अभिलेखातील केवळ साध्या लेखन व टंकलेखनाच्या चुका दुरुस्त करण्यापुरताच मर्यादित राहणार आहे.
त्यामुळे राज्यात आता जमिनीचा मालकीहक्क, क्षेत्रफळ किंवा हक्कसंबंधी नोंदींमध्ये बदल करण्यासाठी कलम १५५चा वापर करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निर्णयामुळे सातबारा व महसूल नोंदीत मनमानी पद्धतीने बदल करण्यास आळा बसेल. किरकोळ चुका दुरुस्त करण्यापुरताच कलम १५५चा वापर मर्यादित राहिल्याने जमिनीच्या मालकीहक्काशी संबंधित नोंदी सुरक्षित राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलचा अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय

नांदगाव तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलचा अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय

मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलने नांदगाव तालुका स्तरीय (१७ वर्षाआतील, मुले) क्रिकेट स्पर्धेत...

read more
महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ तर्फे मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी

महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ तर्फे मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी

महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ मनमाड शहर च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम...

read more
.