loader image
[ays_poll id=7]

कलम १५५ च्या वापरावर राज्य सरकारकडून निर्बंध!

Sep 2, 2026


महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम १५५च्या अधिकाराच्या गैरवापराच्या घटना समोर आल्यानंतर राज्य सरकारने त्याच्या वापरावर निर्बंध घातले आहेत.
आता या कलमाचा वापर महसूल नोंदी, सातबारा किंवा भूमी अभिलेखातील केवळ साध्या लेखन व टंकलेखनाच्या चुका दुरुस्त करण्यापुरताच मर्यादित राहणार आहे.
त्यामुळे राज्यात आता जमिनीचा मालकीहक्क, क्षेत्रफळ किंवा हक्कसंबंधी नोंदींमध्ये बदल करण्यासाठी कलम १५५चा वापर करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निर्णयामुळे सातबारा व महसूल नोंदीत मनमानी पद्धतीने बदल करण्यास आळा बसेल. किरकोळ चुका दुरुस्त करण्यापुरताच कलम १५५चा वापर मर्यादित राहिल्याने जमिनीच्या मालकीहक्काशी संबंधित नोंदी सुरक्षित राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये वैकुंठ चतुर्दशी निमित्ताने “श्री हरी-हर” भेट संपन्न….

श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये वैकुंठ चतुर्दशी निमित्ताने “श्री हरी-हर” भेट संपन्न….

मनमाड : ( योगेश म्हस्के )कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावेही ओळखली जाते. असे...

read more
मनमाड महाविद्यालयात शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

मनमाड येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा...

read more
गौरवास्पद – मूळच्या नांदगावच्या असलेल्या क्षितिजा भास्कर कदम यांचा नॉटिंगहॅम (लंडन) ट्रेंट विद्यापिठात एमबीए ( डिजिटल मार्केटिंग) परीक्षेत प्रथम क्रमांक, ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे अभिनंदन

गौरवास्पद – मूळच्या नांदगावच्या असलेल्या क्षितिजा भास्कर कदम यांचा नॉटिंगहॅम (लंडन) ट्रेंट विद्यापिठात एमबीए ( डिजिटल मार्केटिंग) परीक्षेत प्रथम क्रमांक, ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे अभिनंदन

नांदगाव - लंडन येथील नॉटिंहम ट्रेंट विद्यापिठात नाशिक जिल्ह्यातील क्षितिजा भास्कर कदम यांनी एमबीए...

read more
.