loader image
[ays_poll id=7]

दुष्काळ आणि महागाईच्या चक्रात अडकला “बैलपोळा”

Sep 9, 2026


आधीच पावसाने घेतलेली विश्रांती आणि सर्जा-राजाच्या सजावटीच्या साहित्याच्या दरात झालेली वाढ यामुळे सर्जा-राजाच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलपोळा साजरा कसा करावा? असा प्रश्न परिसरातील शेतकरी राजाला पडला आहे.
पावसाने गेल्या सव्वा महिन्यापासून ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अशा स्थितीत एकीकडे पिके वाचविण्याची चिंता सतावत असतानाच बैलपोळ्याच्या तोंडावर सर्जा-राजाच्या साजशृंगाराच्या साहित्य दरात २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
शेतमालाचे घसरलेले दर, वाढती महागाई आणि पावसाची दडी यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे यंदा बैलपोळ्याची खरेदी अत्यंत हात राखून केली जात आहे. परिणामी, दरवर्षी गजबजणाऱ्या बाजारपेठेत यंदा शुकशुकाट असून, व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

मनमाड - अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा...

read more
१५००० ची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ए सी बी च्या जाळ्यात

१५००० ची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ए सी बी च्या जाळ्यात

येवला - ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात येवला तालुक्यातील बदापूर...

read more
.