loader image
[ays_poll id=7]

करपलेल्या पिकांच्या नुकसानीचे थेट शेतात जाऊन सर्वेक्षण होणार!

Sep 10, 2026


महिनाभरापेक्षा जास्त काळापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ज्या उभी पिके करपून गेलेल्या भागाचे अधिकारी शेतात येऊन हे सर्व्हेक्षण करणार आहेत. काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन आणि मुख्य सचिवांना त्याबाबतचे आदेशच दिल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग तिघेही मिळून हे सर्व्हेक्षण करणार आहेत. हे संपूर्ण सर्व्हेक्षण झाल्यानंतर शेतकऱ्यांना निश्चित मदत करण्याचा निर्णयही शासनाने घेतला असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

मनमाड - अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा...

read more
१५००० ची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ए सी बी च्या जाळ्यात

१५००० ची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ए सी बी च्या जाळ्यात

येवला - ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात येवला तालुक्यातील बदापूर...

read more
.