मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन झाल्यास त्यांच्याकडे अंतविधीसाठी देखील पैसे नसतात, अशा नागरिकांसाठी नगर परिषदेच्या माध्यमातून मोफत लाकडे पुरविण्यात यावीत, असे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) च्या वतीने जिल्हा सरचिटणीस गंगादादा त्रिभुवन यांनी नगर पालिकेला दिले आहे.
नगर परिषदेच्या माध्यमातून असे लोकहितकारी निर्णय घेऊन नगरपालिकेने नवा आदर्श निर्माण निर्माण करावा व आर्थिकदृष्टीने गरजवंत नागरिकांना दिलासा द्यावा, असे देखील निवेदनात नमूद करण्यात आले आहे.











