कर्णधार विराट कोहलीने टी–२० वर्ल्डकप नंतर कर्णधारपद सोडण्याचे जाहीर केलेले असतांनाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आता संघाच्या मुख्य कोचसाठी माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याची वर्णी करण्याची शक्यता आहे.
रवी शास्त्री यांचा कॉन्ट्रैक्ट संपणार असल्याने बीसीसीआय अनिल कुंबळेंच्या पर्यायाची चाचपणी करीत आहे. २०१७ साली चॅम्पियन ट्राफीमध्ये भारताचा पाकिस्तानने पराभव केल्यानंतर अनिल कुंबळेने मुख्य कोचचा राजीनामा दिला होता. विराट कोहली सोबत असलेल्या त्याच्या संबंधांमुळे अनिल कुंबळेला हे थोडे अवघडल्या सारखे होते.
विराट कोहलीचे टी–२० कर्णधारपद सोडणे व रवी शास्त्री यांचा कॉन्ट्रक्ट संपणे याच्या पार्श्वभुमीवर बीसीसीआय अनिल कुंबळेला परत मुख्य कोचची जबाबदारी देऊ शकते.










