loader image
[ays_poll id=7]

३० वर्षे सत्ता असूनही मुंबईत मराठी परकीच – आमदार अमित साटम!

Oct 1, 2021


मुंबई कोणाची ? मराठी माणसाची…एकेकाळी स्व.बाळासाहेबांनी मराठी मुंबईची केलेली ओळख…आणि मुंबई कायम राजकीय पटलावर चर्चेत राहिलेले विषय. सध्या मुंबई विविध प्रकरण गाजत असून याच मुद्द्यावरून विरोधकांनी सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला धारेवर धरले आहे. गुरुवारी भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्र लिहल्यानंतर आज भाजप आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. यात मुंबईत मराठी भाषेवरून मुख्यमंत्री ठाकरेंवर घणाघाती टीकाही केली आहे.

मुंबईत ३० वर्षे शिवसेनेची सत्ता असून देखील मुंबईत मराठी भाषेची अवस्था अतिशय बिकट असल्याचे साटम यांनी म्हटले आहे. शिवसेनेकडून मराठी भाषेच्या विस्तारासाठी प्रयत्न होत नसल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साटम यांनी पत्र पाठवले असून त्यामध्ये त्यांनी मराठी भाषा व मराठी शालांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
 
मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला गेला, तशीच अवस्था मराठी शाळांची आणि भाषेची झाली आहे. सण 2010-11 मध्ये मराठी शाळांची संख्या ४१३ होती आता सन २०२०-२०२१ मध्ये शाळांची संख्या फक्त २८० इतकी राहिल्याचे साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रातून म्हटले आहे.

अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
.