loader image
[ays_poll id=7]

काँग्रेसला राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्यासाठी युवाशक्तीच्या ताकदीची गरज – नाना पटोले

Oct 5, 2021


‘काँग्रेस पक्ष देशातील सर्वात जुना व अनुभवी पक्ष असून देशाची लोकशाही व संविधान हे काँग्रेसच वाचवू शकते. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष संघटना बळकट झाली पाहिजे. राज्यात काँग्रेस पक्षाला क्रमांक एकचा पक्ष करण्याचा निर्धार केला आहे, यासाठी एनएसयुआयच्या (National Students Union Of India) युवाशक्तीने पूर्ण ताकदीने काम करुन काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यात योगदान दिले पाहिजे’, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला नाना पटोले मार्गदर्शन करत होते. ते पुढे म्हणाले की, तरुण हे देशाचे भविष्य आहेत. आपला देश हा तरुणांची जास्त संख्या असलेला देश असून देशाचे भविष्य तुमच्या हातात आहे. तुम्ही काँग्रेस पक्षाची उद्याची ताकद आहात. सामान्य माणसातून नेतृत्व उदयाला आले पाहिजे, यासाठी एनएसयुआयनेही तालुका पातळीपर्यंत जाऊन विस्तार केला पाहिजे, जनसंपर्क वाढवला पाहिजे, एनएसयुआयच्याही बुथ कमिट्या बनवल्या पाहिजेत. तुमच्यातून पक्षाचे नेतृत्व पुढे आले पाहिजे त्यासाठी ताकदीने कामाला लागा. या कार्यक्रमाला राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम पांडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख व एनएसयुआयचे पदाधिकारी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलचा अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय

नांदगाव तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलचा अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय

मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलने नांदगाव तालुका स्तरीय (१७ वर्षाआतील, मुले) क्रिकेट स्पर्धेत...

read more
महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ तर्फे मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी

महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ तर्फे मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी

महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ मनमाड शहर च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम...

read more
खेळातून शरीरबला बरोबर मानवी मन-मेंदू सक्षम व बलवान होण्यासाठी विवेकी विचार-वर्तनाची जोड द्यावी : प्रा.अर्जुन कोकाटे : येवला तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे शानदार उदघाटन

खेळातून शरीरबला बरोबर मानवी मन-मेंदू सक्षम व बलवान होण्यासाठी विवेकी विचार-वर्तनाची जोड द्यावी : प्रा.अर्जुन कोकाटे : येवला तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे शानदार उदघाटन

येवला (प्रतिनिधी) विविध प्रकारच्या खेळातून शरीरबला बरोबर मानवी मन-मेंदू सक्षम व बलवान हिण्यासाठी...

read more
.