संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोन विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी जगभरातील देश लसीकरण करवून घेत आहेत, भारतात देखील मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या लसीकरण मोहिमेत आज भारताने नवीन इतिहास रचलेला आहे. भारताने मात्र १० महिन्यात १०० लसीकरणाचा भीम पराक्रम आज सकाळी ९.४५ मिनिटांनी केला. १६ जानेवारी पासून सुरु झालेल्या लसीकारण मोहिमेने २० करोड लसींचा टप्पा फक्त ३१ दिवसात पूर्ण केला . १०० कोटी डोस पूर्ण झाले आहेत हि माहिती नागरिकांना माहित व्हावी, यासाठी शासनाने रेल्वे , विमान तसेच जहाजांवर लाउड स्पिकरद्वारे घोषणा करण्याची योजना देखील आखली आहे, त्याचबरोबर ज्या गावांनी १०० टक्के लसीकरणाचा टप्पा पार केला आहे त्यांनी पोस्टर द्वारे स्वास्थ्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करावा, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत . १०० कोटी डोस पूर्ण झाल्याच्या आनंद साजरा करण्यासाठी स्वास्थ्य मंत्री मनसुख मंडाविया हे आज दुपारी लाल किल्यावर १ गाणे आणि लघु चित्रपट देखील प्रदर्शित करणार आहेत .
वात्रटिका हे टीका करण्याचे उत्तम साधन – कवी हेमंत वाले
नाशिक (प्रतिनिधी) प्रत्येक व्यक्ती डोळसपणे समाजाकडे बघत असतो. दैनंदिन जीवन व्यवहारात वावरत असताना...











